ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ Dainik Gomantak
महाराष्ट्र

विधवा महिलांसाठी ग्रामविकास विभागाच्या 'या' नव्या योजना

युवक-युवतींना 10 ते 45 दिवसांचे कृषि विषयक (Agricultural) प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग, उत्पादक यांचे प्रशिक्षण तसेच विविध व्यवसायांचे (businesses) मोफत व निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: कोरोनामध्ये घरातील कर्ता पुरुष मृत्यु झाल्याने घरातील विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ सुरु केली आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या (उमेद) ग्रामीण भागातील (Rural areas) गरीब महिलांना उपजीविकेच्या संधी मिळण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न सुरु आहे.ही योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या शासन निर्णयानुसार गावोगावी समिती करून एकल, विधवा महिलांना स्वयंसहाय्यता समूहामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नियमानुसार या महिलांच्या किमान पाच सदस्यांच्या स्वतंत्र स्वयंसहाय्यता समूहाला उमेद योजनेचे लाभ देण्यात येणार आहेत.

उमेद मधून एकल/विधवा महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देण्यात येतील. तसेच त्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक, युवतींना दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षणास प्राधान्य देण्यात येईल. आरसेटी योजनेअंतर्गत 18 ते 45 या वयोगटातील युवक-युवतींना (Youth) 10 ते 45 दिवसांचे कृषि विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग, उत्पादक यांचे प्रशिक्षण तसेच विविध व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

Shani Margi 2025: कर्मफल दाता शनीची चाल 138 दिवसांनंतर बदलली! 'या' 5 राशींच्या लोकांना होणार मोठा धनलाभ, नोकरीत बढतीचाही योग

SCROLL FOR NEXT