Rajesh Tope warns about COVID-19 third wave in December in Maharashtra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

डिसेंबरमध्ये राज्यात कोरोनाची तिसरी लाट, आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा इशारा

महाराष्ट्रातील 80 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून सध्या संसर्गाची पातळी आणि मृत्यूचे प्रमाण देखील कमी आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात सध्या कोरोना (COVID-19) रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूच्या साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केली आहे. परंतु त्याचा परिणाम सौम्य असेल आणि म्हणून तिसऱ्या लाटेत वैद्यकीय ऑक्सिजन आणि अतिदक्षता विभाग (ICU) बेडची गरज भासणार नाही.टोपे म्हणाले, "तिसरी लाट सौम्य असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची गरज भासणार नाही." कोविड -19 च्या सध्याच्या परिस्थितीबद्दल टोपे म्हणाले की, महाराष्ट्रातील 80 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून सध्या संसर्गाची पातळी आणि मृत्यूचे प्रमाण देखील कमी आहे.(Rajesh Tope warns about COVID-19 third wave in December in Maharashtra)

आरोग्य विभागाने मंगळवारी सांगितले की, गेल्या 24 तासांत राज्यात कोविड-19 चे 766 रुग्ण आढळून आले आणि 19 जणांचा मृत्यू झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या 10,000 च्या खाली आहे. मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात एकूण 66,31,297 संसर्गाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. टोपे म्हणाले की, कोरोना विषाणूच्या साथीची पहिली लाट सप्टेंबर 2020 मध्ये आली आणि दुसरी लाट एप्रिल 2021 मध्ये आली.

यावेळी बोलताना टोपे म्हणाले की त्यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली होती आणि आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि संसर्गाच्या असुरक्षित घटकांना लसीचे बूस्टर डोस देण्यासाठी केंद्राची परवानगी मागितली होती. तसेच संसर्ग टाळण्यासाठी 12 ते 18 वर्षे वयोगटातील बालके व किशोरवयीन मुलांना लसीकरण करण्याची मागणीही करण्यात आली. टोपे म्हणाले, "मांडवीय यांनी सांगितले की ते भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेशी (ICMR) चर्चा करून या विषयावर माहिती देतील."

तर दुसरीकडे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), दिल्लीचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे की, देशात कोविडच्या पहिल्या दोन लहरींच्या तुलनेत तितक्याच तीव्रतेची तिसरी लाट अपेक्षित नाही. गुलेरिया म्हणाले की यावेळी संसर्गाच्या प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, हे दर्शविते की लस अजूनही विषाणूपासून संरक्षण देत आहेत आणि सध्या तिसऱ्या बूस्टर डोसची आवश्यकता नाही.वैद्यकीय तज्ज्ञांनी असेही म्हटले आहे की दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसरी लाट अपेक्षित नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

SCROLL FOR NEXT