Subhash Desai Dainik Gomantak
महाराष्ट्र

Subhash Desai: राष्ट्रीय महत्त्वाच्या धोरणांवर केंद्र राज्यांशी सल्लामसलत करत नाही, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा आरोप

Subhash Desai: राष्ट्रीय महत्त्वाची धोरणे तयार करताना केंद्र राज्य सरकारांशी सल्लामसलत करत नाही, असे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय महत्त्वाची धोरणे तयार करताना केंद्र सरकार राज्य सरकारांशी सल्लामसलत करत नाही, असे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी म्हटले आहे. भाजप आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील सतत घर्षण आणि राजकीय रणधुमाळी याचा देशावर विपरित परिणाम झाला आहे, असेही ते म्हणाले. भारत सरकारने राष्ट्रीय महत्त्वाच्या नवीन धोरणांची आखणी करतांना राज्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. तसेच राज्यांचे म्हणणे ऐकायला हवे. त्याचीच सध्या कमतरता आहे. दोघांमध्ये जो संवाद हवा होता तो होत नाही. तुम्ही आमचे मत घेतल्यास आम्ही तुमची दिशाभूल करणार नाही. (maharashtra minister subhash desai centre not consulting states on policies of national significance)

आपण आपल्या राज्याच्या हिताचे रक्षण करू शकतो. महत्वाच्या विचारांची ही देवाणघेवाण होत नाही, असे देसाई यांनी येथील एक्सप्रेस टाऊनहॉलमध्ये सांगितले. देसाई पुढे म्हणाले की, देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राचे (Maharashtra) महत्त्व असूनही, 2019 मध्ये महाराष्ट्र विकास आघाडी (MVA) सरकार स्थापन झाल्यापासून त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली नाही.

बुलेट ट्रेनसारख्या (Bullet Train) महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन करताना केंद्र सरकारने राज्यांचे मत विचारात घेत नसल्याचेही ते म्हणाले. संपूर्ण देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करताना, तुम्हाला सर्व भागधारकांशी संपर्क साधण्याची गरज आहे, देसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran: इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची मोठी कारवाई! 5 पोलिसांच्या हत्येचा बदला घेत 13 दहशतवाद्यांचा केला खात्मा VIDEO

Monthly Horoscope September 2025: सप्टेंबरमध्ये 'या' 5 राशींचे भाग्य उजळणार! ‘भद्र राजयोग’ देणार सुख-समृद्धी; धन-संपत्तीत होणार मोठी वाढ

Velsao Gram Sabha: वेळसाव ग्रामसभेचा मोठा निर्णय! मेगा प्रकल्पांच्या बांधकामावर बंदी; 'कचरा, पाणी आणि रस्त्यांची भेडसावतेय समस्या

Data Protection Law: चिंता मिटली! खरेदी करताना नाही द्यावा लागणार मोबाईल नंबर, ग्राहकांच्या गोपनीयतेसाठी सरकार आणतयं नवा कायदा

Kabul Bus Accident: काबूलमध्ये भीषण अपघात, प्रवासी बस उलटून 25 जणांचा मृत्यू; 27 जखमी

SCROLL FOR NEXT