Maharashtra: राज्यातील नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी 1200 कोटींच्या निधीची मागणी  Twitter /Office of Uddhav Thackeray
महाराष्ट्र

Maharashtra: राज्यातील नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी 1200 कोटींच्या निधीची मागणी

नक्षलग्रस्त भागांचा आणि त्यांच्या विकासाकरीता राज्याला 1200 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात नक्षलग्रस्त भागांचा विकास आणि नक्षलवादी लोकांशी दोन हात करण्यासाठी राज्याला 1200 किती रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाहांकडे केली.बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आढावा घेण्याकरीता सांगितले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थिती, नक्षलग्रस्त भागातील परिस्थिती आणि नक्षलग्रस्त भागात कराव्या लागणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यासाठी लागणारा खर्च याची मांडणी गृहमंत्र्यांसमोर मांडली.

याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागात शाळा कशा वाढतील, या भागात सुरक्षा आणि पोलिस यंत्रणांना काम करतांना अनेकदा नेटवर्कच्या समस्याचा सामना कारवया लागतो. त्यासाठी या भागात मोबाइल टॉवर्स उभारण्याची गरज आहे. या दोन गोष्टींमुळे या भागांचा विकास होऊ शकतो. असे मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीमध्ये राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलिस महासंचालक उपस्थित होते.

दरम्यान, सध्या राज्यातील गडचिरोली आणि चंद्रपूर या भागांमध्ये नक्षलवादाची समस्या अधिक दिसून येत आहे. ही समस्या मोठ्या शहरांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. अशी भीती गुप्तचरांनी केली आहे. या मुद्यावर केंद्र आणि राज्यांनी मिळून काम करणे आवश्यक आहे . या विषयावर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावले होते. या बैठकीत देशातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री हजर होते.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाहां या दोघांमध्ये 2019 नंतर दुरावा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आज अनेक दिवसांनी हे दोघे बैठकीच्या निमिताने दिल्लीत एकत्र आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT