Tillari Dam Dainik Gomantak
महाराष्ट्र

तिल्लारी धरणाच्या पातळीत वाढ; लोकांमध्ये भितीचे वातावरण

113.20 मीटर ही धरणातील (Tillari Dam) जलसाठ्याची पातळी आहे.

दैनिक गोमन्तक

गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या धुवांधार पावसामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) तिल्लारी धरणाची (Tillari Dam) पातळी वाढत असली, तरी अद्याप जलसाठ्याने धोक्याची पातळी गाठली नसल्याची माहिती मिळाली आहे. धरण प्रकल्प अधिकारीणीने अद्याप धोक्याचा 'अलर्ट' दिला नसला, तरी पावसाचा जोर पाहता धरणातून मोठ्या प्रमाणात जलविसर्गाचा धोका वाढला आहे. आजच्याप्रमाणेच उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील एक-दोन दिवसात धरणातून जलविसर्ग अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शापोरा नदीकाठी भिती पसरली आहे.

113.20 मीटर ही धरणातील जलसाठ्याची पातळी आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी 109 मीटरहून अधिक वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणातील पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी आणि जलविसर्गाचा धोका टाळण्यासाठी धरणातील अतिरिक्त पाणी बाहेर सोडण्याचा निर्णय धरण प्रकल्प अधिकारीणीने घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. आज दिवसभरात सायंकाळपर्यंत तिळारी परिसरात 71.6 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

शापोरा तुडूंब

तिल्लारी धरणात जलविसर्ग सुरु झाला की अतिरिक्त पाणी शापोरा नदीत सोडण्यात येते. त्यामुळे शापोरा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढते. सद्यस्थितीत मुसळधार पावसामुळे साळ, मेणकूरेहून वाहणारी शापोरा नदी तुडूंब भरली आहे. त्यामुळे नदीकाठी भिती पसरली आहे. सायंकाळी साळ बंधाऱ्यावरील पदपुलापर्यंत पाणी पोचले होते. सखल भागातही पाणी साचले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT