दौलत देसाई.jpg 
महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा तो निर्णय अखेर रद्द 

दैनिक गोमंतक

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढतानाच दिसत आहे. कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत तर काही ठिकाणी संपूर्ण जिल्हाच लॉकडाउन केला आहे. अशातच संचारबंदी आणि लॉकडाऊन नंतर आता महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश दिले.  कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी आरटीपीसीआर अथवा ॲन्टीजेन चाचणी नकारात्मक प्रमाणपत्र बंधनकारक केले असून हे प्रमाणपत्र मागील 48 तासाच्या आतील असणे बांधनकारक करण्यात आले होते. मात्र आता कोल्हापूर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे. 

कोल्हापूरमध्ये  कोरोनाबंधितांची संख्या कमी असल्याने कोल्हापूरमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र पुणे, मुंबई, सातारा, सांगली या ठिकाणाहून कोल्हापूर मध्ये जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाल्याने कोल्हापुरातील कोरोनाबंधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कोल्हापुरात येणाऱ्यां नागरिकांसाठी कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतला आहेत. तसेच ज्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह अहवाल नसतील तर त्यांना विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल, असेही सांगण्यात आले होते. मात्र आता हा निर्णयच रद्द करण्यात आला आहे. 

तर, परजिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला विलगीकरणायात ठेवावे, तहसिलदार, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी आणि तलाठी यांना गावं वाटून द्यावीत, कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, इतके सर्व करूनही जर  नियमांचे कुणी पालन करत नसेल तर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दौलत देसाई यांनी दिले होते. या निर्णयामुळे कोरोनाच्या धास्तीमुळे आपापल्या घरी परतणाऱ्या नगरिकान त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय  मागे घेण्यात आला आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT