Maharashtra HighWay Dainik Gomantak
महाराष्ट्र

महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासन उचलणार ही पावले

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र: राज्यात हा महामार्ग सुमारे 40 हजार किलोमीटर पसरलेला असून अशा परिस्थितीत या मार्गांवरून दररोज किती वाहने जात असतील याचा अंदाज बांधता येईल. महाराष्ट्र महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार महामार्गावर अपघात होऊन दररोज सुमारे 35 जणांचा मृत्यू होतो.(administration will take steps to prevent accidents on the highway in maharashtra)

महाराष्ट्र महामार्गाचे एडीजी कुलवंत सरंगल यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधताना सांगितले की, हे अपघात कधी कधी अभियांत्रिकी चूक, मानवी चुकांमुळे किंवा हवामानामुळे होतात. अशा स्थितीत महामार्गावरून (HighWay) चालताना लोकांनी सावधपणे चालावे. 2019 या वर्षात महामार्गावर एकूण 32925 अपघात झाले ज्यात 12788 लोकांचा मृत्यू झाला म्हणजेच त्या वर्षात एका दिवसात 35 लोकांचा मृत्यू झाला तर 28628 लोक जखमी झाले.

2021 मध्ये एका दिवसात 37 लोकांचा मृत्यू झाला

2020 या वर्षात महामार्गावर एकूण 24971 अपघात झाले, त्यापैकी 11569 लोकांचा मृत्यू झाला, म्हणजे त्या वर्षात एका दिवसात 32 लोकांचा मृत्यू झाला तर 19914 लोक जखमी झाले. 2021 या वर्षात महामार्गावर एकूण 29494 अपघात झाले, त्यापैकी 13528 लोकांचा मृत्यू झाला, म्हणजे त्या वर्षात एका दिवसात 37 लोकांचा मृत्यू झाला आणि 23080 लोक जखमी झाले.

सरंगल म्हणाले की, महाराष्ट्रासह आणखी 4 राज्यांनी इंटिग्रेटेड रोड अ‍ॅक्सिडेंट डेटाबेस नावाचे सॉफ्टवेअर वापरण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आम्ही दैनंदिन अपघातांची माहिती फीड करतो आणि येणार्‍या काळात आमच्याकडे इतका डेटा असेल, ज्याचे विश्लेषण केल्यानंतर आम्हाला इतके कळेल की काय करून अपघातांवर नियंत्रण मिळवता येईल.

सरंगल पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या (Maharashtra) महामार्गावर जवळपास 1377 ब्लॅक स्पॉट आहेत जेथे अनेक अपघात होतात. हे असे स्पॉट आहेत जेथे 5 किंवा अधिक अपघात होतात. महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) म्हणण्यानुसार, नाशिक ग्रामीणमध्ये एकूण 98 ब्लॅक स्पॉट आहेत जेथे अनेक अपघात होतात. याशिवाय साताऱ्यात 85 ब्लॅक स्पॉट्स आहेत, तर औरंगाबाद शहरात 83 ब्लॅक स्पॉट आहेत.

हजारो कोटींची ई-चलान अजून वसूल व्हायची आहेत

सरंगल यांनी सांगितले की, आम्ही आतापर्यंत 5.20 कोटी लोकांना ट्रॅफिकचे वेगवेगळे नियम मोडल्याबद्दल ई-चलन जारी केले आहे, त्यापैकी फक्त 2 कोटी लोकांनी ई-चलन भरले आहे, बाकीच्यांनी भरलेले नाही. दुसरीकडे, पाहिले तर त्यांच्याकडून आम्हाला एकूण 2200 कोटी रुपये वसूल करायचे होते, त्यापैकी 1300 कोटी रुपये अद्यापही लोकांनी भरलेले नाहीत. सरंगल पुढे म्हणाले की, ही रक्कम वसूल करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय लोकअदालत गाठली, त्यानंतर अनेकांनी पैसे भरले, परंतु तरीही पैसे न भरणारे अनेक लोक आहेत, ज्यांना नंतर न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT