India Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

भारताचा पुढील डे-नाईट कसोटी सामना कधी होणार, बीसीसीआयने केली प्लानिंग

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यावर्षीचा डे-नाइट कसोटी सामना बेंगळुरूमध्ये श्रीलंकेसोबत आयोजित करण्याचा विचार करत आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यावर्षीचा डे-नाइट कसोटी सामना बेंगळुरूमध्ये श्रीलंकेसोबत आयोजित करण्याचा विचार करत आहे. कोविडमुळे सामन्यांची जागा मर्यादित असताना बीसीसीआय (BCCI) श्रीलंकेविरुद्धची (Sri Lanka) कसोटी मालिका बेंगळुरूमध्ये घेण्याचा विचार करत आहे. हा दौरा कसोटी ऐवजी तीन T20 सामन्यांच्या मालिकेने सुरू होऊ शकतो जेणेकरून बबल टू बबल ट्रान्सफर सहज करता येईल. ही मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ भारत आणि श्रीलंकेत टी-20 मालिका खेळणार आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या वृत्तात ही माहिती दिली आहे. श्रीलंकेसोबत मालिका खेळण्यापूर्वी, भारत वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. मात्र, श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूमध्ये होणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा 100 वा कसोटी सामना असेल. (India Cricket Team Latest News)

धर्मशाळा आणि मोहाली येथे मालिका होऊ शकते

वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, बंगळुरूला जाण्यापूर्वी ट्रॅफिक कमी करण्यासाठी धर्मशाळा आणि मोहालीमध्ये मालिका आयोजित करण्याचा बोर्ड विचार करत आहे. प्राथमिक माहितीनुसार, बेंगळुरू आणि मोहाली कसोटी सामन्यांचे आयोजन करू शकतात आणि त्याआधी मोहाली, धर्मशाला आणि लखनऊमध्ये तीन टी-20 सामने खेळवले जाऊ शकतात.

वृत्तपत्राने आपल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “दौऱ्याच्या सुरुवातीचे दोन्ही T20 सामने धर्मशाला येथे खेळवले जाण्याची शक्यता आहे. यानंतर तिसरा टी-२० सामना मोहालीत आयोजित करून पहिला कसोटी सामना येथे खेळवला जावा. लखनौमध्ये टी-20 सामने होऊ शकत नाहीत. मोहालीत गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात अडचण येऊ शकते कारण तेथे दव मोठी भूमिका बजावेल. तथापि, बीसीसीआय देशातील कोविडच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि त्यामुळे वेळापत्रकाबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

बंगळुरू कोहलीचे दुसरे घर

जर पहिला कसोटी सामना बेंगळुरूमध्ये झाला, जो कोहलीचा 100 वा कसोटी सामना असेल, तर तो महान फलंदाजासाठी एक चांगला क्षण असेल कारण बेंगळुरू हे कोहलीचे दिल्लीनंतर दुसरे घर मानले जाते. इंडियन प्रीमियर लीग सुरू झाल्यापासून कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. 2013 पासून तो या संघाचा कर्णधार होता आणि येथील चाहते त्याच्यावर प्रचंड प्रेम करतात. गेल्या मोसमानंतर कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT