team india s star batsman virat kohli is ready to take a break from cricket Danik Gomantak
क्रीडा

IPL 2022|कोहली क्रिकेटमधून घेणार 'ब्रेक'? असे दिले विराटने उत्तर

माजी खेळाडूंच्या सल्ल्याचे करणार पालन

दैनिक गोमन्तक

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. आयपीएलमध्येही त्याची खराब खेळीमुळे अनेकदा त्याला टिकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर मायकल वॉन, केविन पीटरसन आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्यावर खुद्द विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. (team india s star batsman virat kohli is ready to take a break from cricket)

असे कोहलीने सांगितले

ब्रेक घेण्याच्या प्रश्नावर विराट कोहली म्हणाला की, बरेच लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही, पण माझ्यासाठी एका व्यक्तीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रवी भाई (रवी शास्त्री). कारण त्यांनी मला खूप जवळून पाहिले आहे. गेल्या 6 ते 7 वर्षात मी कसा खेळलो हे त्यांना माहीत आहे. आम्ही खेळलेले सर्व क्रिकेटचे सामने आणि आलेले चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे मला ब्रेक कधी घ्यावा आणि कसा घ्यावा याचा विचार करणे आवश्यक आहे.

पुढील नियोजन

आपल्या भविष्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, सध्या भारताला आशिया चषक आणि T20 विश्वचषक जिंकणे हे त्याचे ध्यैय आहे. त्यासाठी तयारी करत आहे. भारताला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक सामना खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT