Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुध्द टीम इंडियाच्या या गोलदांजाना 'मौका'...

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा (Team India’s Playing XI) संघ कसा असेल याची क्रिकेटप्रेमींना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा (Team India’s Playing XI) संघ कसा असेल याची क्रिकेटप्रेमींना चांगलीच उत्सुकता लागली आहे. टीम इंडियाचे बॉलिंग कॉम्बिनेशन कसे असेल? त्याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मागील काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांचा धांडोळा घेतल्यानंतर त्यासंबंधीचा अंदाज लावणं जास्त काही कठीण नाही. संघाचे बॉलिंग कॉम्बिनेशन कसे असू शकते याचा अंदाज लावण्यापूर्वी, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अर्थात रवी शास्त्री (Ravi Shastri) काय म्हणाले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. रवी शास्त्री यांनी म्हटले आहे की, भारतीय संघ अतिरिक्त फिरकीपटू किंवा अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह जाईल, मैदानावर पडणारे दवं लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल असही त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “आम्ही मैदानावर पडणारं दव लक्षात घेता बॉलिंग कॉम्बिनेशनसह कसे जायचे ते ठरवू. वॉर्म-अप मॅचमुळे टीमला चांगले कॉम्बिनेशन तयार करण्यास मदत होईल. रवी शास्त्री यांनी माध्यमाशी पुढे बोलताना म्हटले की, “ मैदानावरील नेमकी स्थिती काय असू शकते यानुसार संघाची रणनिती ठरविण्यात येईल. त्यानुसार आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीबाबत निर्णय घेऊ. दव बघून, आम्ही संघाच्या बॉलिंग कॉम्बिनेशनसंबंधी निर्णय घेऊ."

भारताचे बहुतेक सामने संध्याकाळी

टी -20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) भारताला आपले सर्व सामने संध्याकाळी खेळायचे आहेत. हे लक्षात घेऊन टीम इंडियाला आपली रणनीती बनवावी लागेल. जर मैदानावर जास्त दवं पडले तर फिरकीपटूंसाठी ते कठीण होईल. त्यांना चेंडूची ग्रीप पकडणे अधिक कठीण होईल, ज्यामुळे फलंदाजांसाठी काम सोपे होईल. हे स्पष्ट आहे की, जर दव जास्त असेल तर भारत 3 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटूसह भारतीय संघ उतरेल. आणि, जर दवं अडथळा बनलं नाही तर 3 फिरकी गोलंदाज आणि 2 वेगवान गोलंदाजासंह टीम इंडिया उतरेल.

बॉलिंग कॉम्बिनेशनवर लक्ष्मण आणि इरफानचे आकलन

क्रिकेट दिग्गजांनीही टीम इंडियाच्या बॉलिंग कॉम्बिनेशनवर आपली मते नोंदवली आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मते, भारताने 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांसह जायला हवे. त्याचबरोबर इरफान पठाणने 3 वेगवान गोलंदाजांसह 2 फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात यावी. तसेच त्याने नावेही सांगितली आहेत. इरफानच्या मते, भारतीय संघाने भुवी, शमी आणि बुमराह यांच्यासोबत वेगवान गोलंदाजीसह उतरावे. तर फिरकी जाडेजा आणि वरुण चक्रवर्तीसोबत जायला हवी. तसे, जर तिसरा फिरकीपटू खेळायचा असेल, तर भारताला अश्विन आणि राहुल चहर यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

SCROLL FOR NEXT