Javed Miandad Dainik Gomantak
क्रीडा

Javed Miandad: ‘अगर मौत आनी है…’, भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेवरुन जावेद मियांदाद बरळले

Javed Miandad Statement: आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाबाबत भारत-पाकिस्तान यांच्यात गतिरोध आहे.

Manish Jadhav

Javed Miandad Statement: आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाबाबत भारत-पाकिस्तान यांच्यात गतिरोध आहे.

आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने पाकिस्तानबाहेर खेळवले जाऊ शकतात, पण पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात येईल की नाही याबाबत शंकाच आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. आता भारताची पाकिस्तान दौऱ्याची पाळी आहे, असे मियांदाद म्हणाले.

मरण हे ठरल्यावर येईल

एका पाकिस्तानी यूट्यूबरसोबत पॉडकास्टदरम्यान बोलताना मियांदाद म्हणाले की, पाकिस्तानला आजही भारतात जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही. जेव्हा मुलाखतकाराने मियांदाद यांना विचारले की, भारताने पाकिस्तानचा (Pakistan) दौरा करावा का, तेव्हा त्यांनी पटकन उत्तर दिले - त्यांनी नक्कीच यावे. भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेबाबत विचारले असता मियांदाद म्हणाले की- सुरक्षेबाबत कोणतीही चिंता नसावी. आमचा विश्वास आहे की, जर मृत्यू यायचा असेल तर तो आलाच पाहिजे, जीवन आणि मृत्यू अल्लाहच्या हातात आहे.

जर त्यांनी आज आम्हाला बोलावले तर आम्ही जाऊ

मियाँदाद म्हणाले की- त्यांनी आज आम्हाला बोलावले तर आम्ही जाऊ. आम्ही गेल्या वेळी गेलो होतो, तेव्हापासून ते इथे आले नाहीत. आता त्यांची पाळी आहे. देशांनी एकत्र काम करुन द्विपक्षीय संबंध सुधारले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

'नरकात जा' असे विधान केले होते

या वर्षाच्या सुरुवातीला प्रसारमाध्यमांशी बोलताना मियांदाद यांनी भारताला पाकिस्तान दौरा करायचा नसेल तर नरकात जा, असे वादग्रस्त विधान केले होते. बीसीसीआयने (BCCI) गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT