ipl 2022 ravichandran ashwin says about lost match against mumbai indians Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: रविचंद्रन अश्विनने सांगितले मुंबईविरुद्धच्या पराभवाचे कारण

मुंबईसमोर 159 धावांचे लक्ष्य होते

दैनिक गोमन्तक

राजस्थान रॉयल्सचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्सच्या हातून त्याच्या संघाचा पाच विकेट्सनी पराभव केल्यानंतर सांगितले की जर धुके नसते तर, 159 धावांचे लक्ष्य पुरेसे ठरले असते. या सामन्यात विजयाची नोंद करून मुंबईने अखेर आयपीएलच्या चालू मोसमात आपले खाते उघडले आणि त्यांचा कर्णधार रोहित शर्माला 35 व्या वाढदिवसाची सर्वोत्तम भेट दिली. (ipl 2022 ravichandran ashwin says about lost match against mumbai indians)

मुंबईसमोर 159 धावांचे लक्ष्य होते ते त्यांनी 19.2 षटकात पूर्ण केले. त्यांच्याकडून सूर्यकुमार यादवने 51 आणि टिळक वर्माने 35 धावा केल्या. "मला वाटतं धुके पडले नसते तर ही धावसंख्या पुरेशी ठरली असती, पण तिथे भरपूर धुके होते. त्यामुळे खेळताना अडचणी निर्माण झाल्या.

आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्याच्यापेक्षा एक विकेट जास्त घेतली. हा पराभव दुर्दैवी असला तरी धुके असल्यामुळे चांगली खेळी करता आली नाही. चेंडू ओव्हरपिच होत होता आणि शेवटी फिरकीपटूंना खेळताना अडचणी निर्माण झाल्या. तो म्हणाला, “जेव्हा मैदानात धुक्याचा प्रभाव पडतो तेव्हा असे होते. आम्ही चांगली धावसंख्या केली होती. 10-15 धावा जास्त झाल्या असत्या तर बरे झाले असते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim: पार्से-आगरवाडा जंक्शनवर भरतोय मजुरांचा बाजार, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

"पाकिस्तानमध्ये खोलीबाहेर बंदुक घेऊन उभे होते" लिटन दासच्या विधानानं क्रिकेट विश्वात खळबळ, केला मोठा गौप्यस्फोट

Goa Water supply: आठ दिवसांत सातवेळा फुटली जलवाहिनी, उगवेत तीव्र नाराजी; पाणीपुरवठ्याचा बोजवारा; जीर्ण जलवाहिनी बदलावी

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

SCROLL FOR NEXT