कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यावर कोहलीने अखेर आपले मौन सोडले. Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: ...म्हणून सोडले कर्णधारपद, विराटचे स्पष्टीकरण

मला माझ्या जबाबदाऱ्यांबद्दल अप्रामाणिक व्हायचे नाही. जर मी काही कामांना 120 टक्के देऊ शकत नाही तर मी ते करुन काय फायदा नाही.

दैनिक गोमन्तक

विराट कोहलीने (Virat Kohli) काही दिवसांपूर्वी भारतीय टी 20 संघ (Indian T20 team) आणि IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) कर्णधारपदावरून (Captaincy) पायउतार होण्याचा निर्णय घेतला. टी -20 विश्वचषकानंतर तो भारतीय संघाचे कर्णधारपद सोडणार आहे, आयपीएलच्या या मोसमानंतर बंगळुरूच्या कर्णधारपदावरून तो पायउतार होईल. कोहलीच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांची खूप निराशा झाली.

यावर कोहलीने अखेर आपले मौन सोडले आहे. तो म्हणाला, या निर्णयामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कामाचा भार आणि व्यवस्थापन हेच आहे. भारतीय कर्णधाराने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, माझा कोणतेही काम 120 टक्के करण्याचा प्रयत्न असतो. 'सर्वप्रथम, कामाचा ताण हे यामागील मुख्य कारण होते. मला माझ्या जबाबदाऱ्यांबद्दल अप्रामाणिक व्हायचे नाही. जर मी काही कामांना 120 टक्के देऊ शकत नाही तर मी ते करुन काय फायदा नाही.

2013 च्या आयपीएल हंगामात कोहलीने बंगळुरूचे कर्णधारपद स्वीकारले. त्याच्या आधी डॅनियल व्हिटोरी ही भूमिका साकारत होता. दरम्यान, बंगळूरचा संघ चार वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. 2016 मध्ये बंगळुरला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. IPLच्या या मोसमानंतर तो बंगळुरूच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे विराटने याआधीच स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोहली आपल्या संघाचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा आणि त्यांना बंगळूरला प्रथमच चॅम्पियन बनवण्याचा प्रयत्न करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT