India vs England 5th Test Dharamsala AFP
क्रीडा

IND vs ENG, 5th Test: धरमशालेच राहणार फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व? कसे आहेत खेळपट्टीचे अंदाज

Dharamsala Pitch: भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाचवा कसोटी सामना धरमशाला येथे होणार आहे. या सामन्यात खेळपट्टी कशी असेल, याबद्दल सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

Pranali Kodre

India vs England 5th test in Dharamsala pitch report

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा सामना धरमशाला येथे होणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणारा हा सामना ७ मार्च रोजी सुरू होणार आहे. दरम्यान, भारताने मालिका आधीच जिंकली जरी असली, तरी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचा भाग असल्याने या सामन्याला त्यादृष्टीने महत्त्व आहे.

दरम्यान, पाचव्या कसोटीला सुरूवात होण्यापूर्वी धरमशाला येथे अवकाळी पाऊस पडत आहे, तसेच थंडीचीही लाट आहे. त्याचमुळे सध्या तेथील वातावरण सामन्यादरम्यान कसे असेल त्याचा खेळपट्टीवर काही परिणाम होणार आहेत की नाही, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

खरंतर धरमशाला येथील वातावरणामुळे बऱ्याचदा वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. परंतु, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार या सामन्यासाठी फिरकीला मदत करणारी खेळपट्टी तयार करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या मैदानाच्या क्युरेटरने भारताचा कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि भारतीय संघव्यवस्थापनेबरोबर बराच वेळ चर्चा केली आहे. दोन दिवसात खेळपट्टीचा स्वभाव बदलणे कठीण आहे. परंतु, त्यावर किती गवत ठेवले जाणार आणि त्याला कधी पाणी घातले जाणार यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत.

दरम्यान पावसामुळे ग्राऊंडस्टाफला खेळपट्टी तयार करताना बऱ्याचदा अडथळा आला आहे. परंतु, अद्याप सामन्याला एक दिवस असल्याने त्यावर काम केले जाऊ शकते. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार धरमशाला येथील सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे येथील खेळपट्टी स्लो टर्नर बनवली असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय संघ धरमशाला येथे आत्तापर्यंत केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. भारताने ऑस्ट्रेलियविरुद्ध 2017 साली कसोटी सामना खेळला होता. ज्यात भारताने विजय मिळवला होता.

या एकमेव कसोटीत एकूण 32 विकेट्स गेल्या होत्या. त्यातील 2 विकेट्स धावबादच्या स्वरुपात गेल्या होत्या, तर 12 विकेट्स वेगवान गोलंदाजांनी आणि 18 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या.

भारतीय संघाने जिंकली कसोटी मालिका

इंग्लंडने हैदराबादला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. परंतु, नंतर भारताने पुनरागमन करत दुसरा, तिसरा आणि चौथा कसोटी सामना जिंकून मालिकाही खिशात टाकली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT