Sourav Ganguly Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: 'हे' 5 संघ पोहचू शकतात सेमी-फायनलमध्ये, गांगुलीची मोठी भविष्यवाणी; पाकिस्तानबद्दलही दिली प्रतिक्रिया

Sourav Ganguly: वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कोणते 5 संघ प्रवेश करू शकतात, याबद्दल सौरव गांगुलीने अंदाज व्यक्त केले आहेत.

Pranali Kodre

Sourav Ganguly picks five semi-final contenders for ICC Cricket World Cup 2023: भारतात यावर्षी वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळली जाणार आहे. 5 ऑक्टोबरपासून या वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. श्रीलंका आणि नेदरलँड्सने क्वालिफायर स्पर्धेतून या वर्ल्डकपसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे आता या वर्ल्डकपमध्ये खेळणारे सर्व 10 संघ निश्चित झाले आहेत.

वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत स्वतंत्रपणे स्पर्धेचे आयोजन करत आहे. यापूर्वी भारताने 1987, 1996 आणि 2011 मध्ये अन्य देशांसह संयुक्तपणे वनडे वर्ल्डकपचे आयोजन केले होते.

यंदा यजमान भारतीय संघाला या वर्ल्डकप विजयासाठी प्रबळ दावेदार म्हटले जात आहे. पण त्यांना अन्य संघांकडूनही कडवी लढत मिळू शकते. याबद्दल विविध आजी-माजी खेळाडू अंदाजही व्यक्त करत आहेत. भारताचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही उपांत्य फेरीत पोहचू शकणाऱ्या 5 संघांचे अंदाज सांगितले आहेत.

गांगुलीने RevSportz ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की 'उपांत्य फेरीत पोहचू शकणाऱ्या संघांचे अंदाज बांधणे कठीण आहे. पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत पोहचू शकतात. तसेच तुम्ही न्यूझीलंडला मोठ्या स्पर्धेत कमी लेखू शकत नाही.'

'मी पाच संघ निवडेल, त्यात पाकिस्तानचाही समावेश करेल. पाकिस्तान पात्र ठरायला ठरले, तर भारत आणि पाकिस्तानचा उपांच्या सामना इडन गार्डन्सला होऊ शकतो.'

वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील एक सामना मुंबईला आणि एक कोलकाताला होणार आहे. तसेच जर पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला, तर त्यांचा सामना कोलकातालाच होणार आहे. त्यामुळे जर भारतही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आणि त्यांचा सामना पाकिस्तानबरोबर होणार असेल, तर तो सामना कोलकाताला इडन गार्डन्सवर होऊ शकतो.

याशिवाय भारतीय संघाला गेल्या 10 वर्षात आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यात आलेल्या अपयशाबद्दलबी गांगुलीने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच जूनमध्ये भारताने कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्विकारला होता.

गांगुली म्हणाला, 'आपण कधी कधी महत्त्वाच्या क्षणी कामगिरी चांगली करत नाही. मला वाटत नाही मानसिक दबावामुळे असे होत असेल, तर हे अंमलबजावणी न झाल्याचे परिणाम आहेत. ते सर्व मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत. आशा आहे की यावेळी ते विजेतेपदापर्यंत पोहचतील. भारताने कमीतकमी कसोटी चॅम्पियनशीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता, हे सुद्धा यशच आहे. आणि नक्कीच आपल्याला संधी आहे.'

'आपल्याकडे चांगले खेळाडू आहे. आशा आहे की यावेळी आपण जिंकू. दबाव नेहमीच असतो. यापूर्वीही दबाव असायचा. अखेरच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने 5 शतके केले होते. मला खात्री आहे त्यावेळीही त्याच्यावर दबाव असेल. दबाव ही समस्या नाही.'

'मला विश्वास आहे की ते यशस्वी होण्याचा मार्ग शोधतील. राहुल द्रविड खेळत असतानाही कामगिरी करण्याचा दबाव होता आणि आता तो प्रशिक्षक आहे, त्यामुळे कामगिरी करून घेण्याचा त्याच्यावरही दबाव आहे. दबाव कधीही गेला नव्हता. मला वाटत नाही की दबाव समस्या आहे.'

दरम्यान, भारतीय संघ वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. तसेच भारताचा साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध 15 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT