Babar And Rohit  Dainik Gomantak
क्रीडा

आशिया चषक स्पर्धेत कोणाचा दबदबा, भारत-पाकिस्तान 13 वेळा आले आमनेसामने; जाणून घ्या रेकॉर्ड

Manish Jadhav

India vs Pakistan: आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरु होत आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. 2 सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील उभय संघांमधील हा 14 वा सामना असेल.

यापूर्वी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 13 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये आम्ही तुम्हाला कोणत्या संघाचा वरचष्मा राहीला आहे त्याबद्दल सांगणार आहोत.

7 वेळा भारताने तर 5 वेळा पाकिस्तानने विजय मिळवला

भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यातील 13 सामन्यांमध्ये टीम इंडियाने सात वेळा विजय मिळवला आहे, तर पाच वेळा पाकिस्तानने विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

या पार्श्‍वभूमीवर आशिया चषकातही टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. आणि आता दोन्ही संघ 14व्यांदा आमनेसामने येणार आहेत.

भारत चॅम्पियन होणार

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत चॅम्पियन बनण्यासोबतच सामना जिंकण्याच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या पुढे दिसतो. दोन्ही संघांनी आतापर्यंत 12 आशिया चषक स्पर्धा खेळल्या आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने (Team India) 6 वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे, तर पाकिस्तानने दोनदा आशिया कप जिंकला आहे.

टीम इंडियाने 1984, 1988, 1990, 1995, 2010 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानबद्दल बोलायचे झाल्यास, पाकिस्तानने 2000 आणि 2008 मध्ये विजेतेपद पटकावले आहे.

रोहित-बाबर कर्णधारपदाची धुरा सांभाळतील

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामना श्रीलंकेतील तटस्थ ठिकाणी खेळवला जाईल. जिथे टीम इंडियाची कमान हिटमॅन रोहित शर्माकडे असेल. तर पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे.

गोलंदाजी आणि फलंदाजीत दोन्ही संघ यावेळीही एकमेकांना कडवी टक्कर देताना दिसत आहेत. अशा स्थितीत ही स्पर्धा रंजक होण्याची अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT