Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: नवरात्रीत वास्तुनुसार 'या' दिशेला ठेवावा अखंड दिवा

वास्तुनुसार नवरात्रीत कोणत्या दिशेला घटस्थापना करावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

देशभरात नवरात्री हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यामुळे प्रत्येक घरात स्वच्छता करून सजावट सुरू झाली आहे. घटस्थापनेसाठी वास्तुशास्त्रात योग्य दिशा कोणती आणि त्याचे महत्व काय आहे सांगितलेले आहे.

कोणत्या दिशेला करायची स्थापना

नवरात्रीमध्ये 9 दिवस घरोघरी अखंड दिवा आणि घटस्थापना केली जाते. या अखंड दिव्यासाठी घरातील कोणती दिशा उत्तम आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. माता दुर्गेची मूर्ती नेहमी ईशान्य दिशेला ठेवावी. ईशान्य दिशा ही सर्वोत्तम आहे असे मानले जाते. ही दिशा सर्वात पवित्र मानली जाते. ईशान्य दिशेला देवाचा वास असतो. त्यामुळे वास्तुनुसार नवरात्रीमध्ये या दिशेला माता दुर्गेची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.

घरामध्ये इशान्य कोन कसे ओळखावे?

उत्तर-पूर्व दिशा ही आपल्या घराची सर्वात पवित्र दिशा मानली जाते. उत्तर आणि पूर्वेतील दिशेला वास्तूमध्ये ईशान्य कोन म्हणतात. या दिशेला घरात मंदिर बांधणे वास्तुनुसार शुभ मानले जाते. कारण या दिशेला देवांचा वास असतो. ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी. जेणेकरून घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास राहतो. ईशान्य दिशेला देवतांचे निवासस्थान म्हटले जाते. जर तुम्ही तुमच्या घरात कलश आणि फोटो या दिशेला लावले तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात राहत नाही आणि या दिशेची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. वास्तूनुसार माता दुर्गेची मूर्ती लाकडी पाटावर ठेवावी. जर तुमच्याकडे चंदनाचा स्टँड असेल तर तुम्ही त्यावरही ठेवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT