Vastu Tips |Earthen Pot  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरात मातीचे भांडे ठेवल्याने कधीही भासणार नाही पैशाची कमतरता

घराच्या सुख-समृद्धीसाठी घरातील वास्तुदोष दूर करणे अत्यंत आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

वास्तुशास्त्रानुसार घरात सुख-शांती टिकुन राहण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. त्यामुळे घरात स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हावी, धन-कीर्ती-वैभव यांचा लाभ मिळेल, यासाठी घरातील वास्तू लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपले जीवन व्यवस्थित आणि समृद्ध करण्यात वास्तुशास्त्राचे विशेष योगदान आहे. (Vastu Tips Earthen Pot News)

घराच्या (Home) कोणत्याही दारावर किंवा कोपऱ्यात जाळे नसावेत. घरामध्ये अनावश्यक कचरा ठेवू नये. घराच्या छतावर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. घरामध्ये सुख-समृद्धी आणि लक्ष्मी टिकवून ठेवण्यासाठी घरात मातीचे भांडे किंवा भांडे ठेवणे शुभ मानले जाते.

भांडे या दिशेला ठेवा

हिंदू धर्मात देवता उत्तर दिशेला राहतात असे मानले जाते. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला पाण्याने भरलेले भांडे ठेवल्यास विशेष लाभ मिळते आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. पाण्याने भरलेला कलश किंवा भांडे कधीही रिकामे नसावेत. असल्यास घरात गरिबी येऊ शकते. त्यामुळे नेहमी भांडे पुरेश्या पाण्याने भरून ठेवावे.

पाण्याने भरलेले भांडे ठेवण्याचे महत्त्व

कडाक्याच्या उन्हात (Summer) थंड पाणी मिळण्यासोबतच घरात पाण्याने भरलेला माठ ठेवल्याने घरात सुख -शांती लाभते. माता लक्ष्मी पाण्याने भरलेल्या भांड्यावर वास करते. पाण्याने भरलेले भांडे ग्रहांवर नियंत्रण ठेवतो आणि आपल्यावर येणारे संकट दूर ठेवते. नोकरीत (Job) बढती मिळण्याची शक्यता वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळते. व्यवसायामध्ये देखिल वाढ होते. तुम्हाला धन-संपत्तीचा लाभ मिळेल. जर एखाद्या व्यक्तीवर शनिदोष किंवा मंगल दोष असेल तर उत्तर दिशेला पाण्याने भरलेला कलश ठेवल्यास त्याला शनिदोष आणि मंगळ दोषापासून मुक्ती मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी दीर्घायुष्याचे रहस्य समुद्राच्या तळाशी? व्हेल माशांमधील 'या' प्रथिनामुळे माणूस जगू शकणार 200 वर्षे! संशोधनातून खुलासा

मुंबई इंडियन्समध्ये मोठा फेरबदल? हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात, आता सूर्या नव्हे तर तिलक वर्माकडे संघाची धुरा!

Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

New Gas Connection: महिनाभरात 11 हजार नव्या 'गॅस जोडण्या', बेकायदा सिलिंडरला बसला चाप

Maratha History: रायगड ते जिंजी: छत्रपती शिवरायांनी कशी उभारली स्वराज्याची दक्षिण फळी?

SCROLL FOR NEXT