Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरासमोर नारळाचे झाड लावणे शुभ की अशुभ? वाचा एका क्लिकवर

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली झाडे आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करतात.

Puja Bonkile

Vastu Tips: हिंदू धर्मात नारळाचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते. हे पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक पूजेत त्याचा समावेश होतो. त्यालाच श्रीफळ असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार नारळाच्या झाडावर माता लक्ष्मी देवी वास करते. अनेकजण आपल्या घरासमोर नारळाची झाडे लावतात. त्यामुळे आजूबाजूचे वातावरण अधिक सुंदर आणि आकर्षक दिसते. घरासमोर नारळाचे झाड लावणे शुभ आहे की अशुभ हे जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार घरासमोर नारळाचे झाड लावले पाहिजे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. यामुळे घरात सुख-समृद्धीही येते. जर तुम्ही घराबाहेर नारळाचे झाड लावण्याचा विचार करत असाल तर नक्की लावा. 

  • नोकरीत मिळेल यश

जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या व्यक्तीने घराच्या अंगणात नारळाचे झाड लावावे. यामुळे घरात कधीही नकारात्मकता पसरत नाही. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. 

  • समस्या कमी होतात

कष्ट करूनही यश मिळत नसेल तर डोक्यावर 21 वेळा नारळ फिरवावे आणि देवी स्थानावर जाळावे. हे तुम्हाला दर मंगळवारी आणि शनिवारी करायचे आहे. यामुळे तुम्हाला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि आजारांपासूनही आराम मिळेल. 

  • नारळाच्या पाण्याचा वापर

घरामध्ये नारळाचे पाणी शिंपडल्याने सकारात्मक उर्जा घरात प्रवेश करते. व्यक्तीला कधीही घरगुती त्रास सहन करावा लागत नाही. याशिवाय कुटुंबातील परस्पर संबंधही दृढ राहतात. 

  • घरात सुख-शांती येते

घरामध्ये नारळाचे झाड लावणे फार महत्वाचे आहे. यामुळे घरात माता लक्ष्मी वास करते  आणि व्यक्तीला सुख, समृद्धी आणि शांतीही मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

भारतीय हवाईदलाच्या विमानांनी 18 डिसेंबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर बॉम्बवर्षाव करून 'गोवा मुक्ती मोहिमे'चा शुभारंभ केला..

अग्रलेख: ज्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी रक्त सांडले, त्याच 'गोव्यात' आज मूळ गोमंतकीयांना जगण्यासाठी देश सोडावा लागत आहे..

Goa News Live: गोवा इतर राज्यांच्या तुलनेत खूप पुढे; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

SCROLL FOR NEXT