Summer Food: उन्हाळ्यात शरीराला उष्णता देणारे असे पदार्थ खाल्ले तर तुम्ही आजारी पडू शकतात. या हंगामात, अशी फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे शरीराला अतिरिक्त थंडावा मिळतो आणि सन स्ट्रोकचा प्रभाव कमी होतो. इथे जाणून घ्या उन्हाळ्यात कोणत्या गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला फायदा होईल.
नारळ पाणी
उन्हाळ्यात पोषक तत्वांनी युक्त नारळ पाणी पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. रोज नारळ पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
संत्रे
संत्र्यात कूलिंग इफेक्ट असतो. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होतो. संत्र्यामध्ये 88 टक्के पाणी, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम आणि फायबर असते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त याचे सेवन करावे
लिंबू
उन्हाळ्यात लिंबाचे सेवन करणेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हे उष्णतेपासून वाचवण्याबरोबरच आतून ताजे राहण्यास मदत करते. उन्हाळ्यात बाहेरून घरी आल्यावर नेहमी लिंबू पाण्याचे सेवन करावे.
हिरव्या भाज्या
काही हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते. पालेभाज्यांमध्ये भरपूर पाणी असते. यामुळे पचनक्रिया बरोबर होईल आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून तुमची सुटका होईल.
याशिवाय उन्हाळ्यात फायबर युक्त काकडीचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरेल. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे. रोजच्या आहारात काकडीचा समावेश नक्की करा.
दही आणि लस्सी
दही आणि लस्सीमध्ये कूलिंग एजंट असते, जे तुमचे उष्णतेपासून संरक्षण करते. तुम्ही थेट दही खाऊ शकता किंवा काकडीसोबत रायता बनवून खाऊ शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.