Navratri 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri 2023: उपवासात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर अशी घ्या काळजी

Puja Bonkile

Navratri 2023: यंदा 15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. नवरात्री दरम्यान माता दुर्गेच्या नऊ रूपाची मनोभावे पुजा केली जाते. अनेक लोक उपवास करतात तर अनेक लोक फक्त सांत्विक आहार घेतात. नवरात्रीच्या काळात उपवास केल्याने तुमच्या शरीराला आणि मनाला अनेक फायदे मिळतात.

पण उपावास दरम्यान तळलेले पदार्थ खाणे आणि आहारात पुरेशा प्रमाणात फायबर किंवा प्रोबायोटिक्सचा समावेश न केल्याने पोटासंबंधित आजार उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी आंबट फळे खाल्ल्याने आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो तर पुरेसे पाणी न प्यायल्यास किंवा हायड्रेटिंग पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते.

अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता म्हणजे काय?

अॅसिडिटी ही समस्या पोटातील अन्न आम्ल वारंवार अन्ननलिकेत परत जाते तेव्हा होते. यामुळे तुमच्या अन्ननलिकेच जळजळ होऊ शकते. तर बद्धकोष्ठता पाणी कमी प्यायल्याने उद्भवू शकते. यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी, फळं, फायबर, भाज्या, प्रोबायोटिक्स यांचा आहारात समावेश करावा.

उपाय

नवरात्रीच्या उपवासा दरम्यान आपल्या खाण्याच्या सवयी बदलू शकतात. ज्यामुळे आपली पचनसंस्था खराब होऊ शकते. तसेच, आपल्यापैकी काही लोक जास्त फायबरयुक्त पदार्थ खात असतात आणि पुरेसे पाणी पीत नाहीत. ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

आंबट फळे

उपवासाच्या वेळी रिकाम्या पोटी संत्री, द्राक्षे आणि लिंबू यांसारखी आंबट फळे खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. या ऐवजी केळी आणि खरबूज यासारखे फळं खावेत. लिंबू, संत्रा आणि द्राक्ष यांसारखी लिंबूवर्गीय फळे खूप आम्लयुक्त असतात.

भरपुर पाणी प्यावे

उपवास दरम्यान हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. उपवासाच्या वेळी थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिणे फायदेशीर असते. तसेच, एकाच वेळी भरपूर पाणी पिऊन पोट भरण्याऐवजी थोडेसे पाणी पिणे चांगले असते. एकाच वेळी पोटभर पाणी प्यायल्याने सूज आणि अॅसिडिटीची समस्या वाढू शकते. नारळ पाणी, ताक, जिरे पाणी, लिंबाचा रस यांसारखे पेय शरीरात नैसर्गिक थंडता टिकवून ठेवू शकतात.

चहा आणि कॉफी पिणे टाळा

काही लोक उपवासाच्या वेळी खूप जास्त चहा किंवा कॉफी पितात. हे तुमच्या गॅस आणि अॅसिडिटीचे कारण असू शकते. त्यामुळे उपवासाच्या वेळी जास्त प्रमाणात चहा-कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही.

ताक आणि थंड दूध

उपवासा दरम्यान ताक आणि थंड दूध यासारख्या पेयांचा समावेश करावा. कारण असे पेय पोट शांत आणि थंड ठेवू शकतात. याशिवाय नारळ पाणी प्यायल्याने पीएच लेव्हल संतुलित राहते आणि शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर काढण्यात प्रभावी ठरते. यामुळे पोटासंबंधित समस्या दूर राहतात.

केळी आणि खरबूज

केळी आणि खरबूज या फळांचे सेवन करावे. केळीमध्ये पोटॅशियमचे उच्च प्रमाण असते, जे ऍसिडिटीशी लढण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी ओळखले जाते. त्यात फायबर देखील असते. जे उपवासाच्या वेळी शरीरासाठी चांगले असते. तसेच शरीरातील पीएच पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते.

नारळ पाणी

उपवासाच्या वेळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यावे. यामुळे तुम्हाला गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळेल. नारळाच्या पाण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते पोटातील आम्लता आणि पीएच संतुलित करण्याचे काम करते. तसेच मुबलक पाणी असल्यामुळे पचनसंस्था सुरळीत राहते. जेणेकरून अॅसिडीटी आणि गॅसचा त्रास होणार नाही. बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT