Morning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Tips: झोपेतून उठल्यानंतर तोंड कोरडे अन् तहान लागल्यासारखे का वाटते?

Puja Bonkile

morning tips why do we feel thirsty after waking up in morning

आपल्या सर्वांना दिवसभरात अनेक वेळा तहान लागते. बाहेरून आल्यावर किंवा दिवसभर कामाच्या थकव्यानंतर तहान लागणे सामान्य आहे. अनेकवेळा जेव्हा तुम्ही खूप खारट किंवा गोड किंवा तेलकट खाद्यपदार्थ खाता तर तुम्हाला दिवसभर तहान लागते. 


पण तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांची पाणी रात्री झोप मोड होते. काही लोकांचे तोंड सकाळी कोरडे होते. अनेक लोक सकाळी उठल्याबरोबर पाणी पितात.  पण असे का होते? झोपेतून उठल्याबरोबर तहान का लागते आणि तोंड कोरडे होण्याचे कारण काय आहे हे जाणून घेऊया.

  • रात्री तोंड कोरडे का पडते?

आपल्या तोंडातून दररोज अर्धा लिटर लाळ तयार होते. लाळ अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावते. आपले शरीर या लाळेचा वापर अनेक प्रकारे करते. लाळेच्या मदतीने आपल्या तोंडातील जंतू कमी होतात. 

हे आपल्या पचनास मदत करते. लाळ निर्माण केल्याने आपले दात किडण्याची शक्यता कमी होते. लाळेमुळे खाद्यपदार्थ चघळणे खूप सोपे होते. इतकेच नाही तर लाळ आपल्याला स्पष्टपणे बोलण्यातही मदत करते. 

जेव्हा लाळ कमी तयार होते, तेव्हा आपले तोंड कोरडे होऊ लागते. जेव्हा तुम्ही रात्री अचानक उठून पाणी पितात, तेव्हा यामागील कारण म्हणजे लाळ तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे तुमचे तोंड कोरडे होते आणि तुम्हाला तहान लागते.

यामुळे तुमच्या श्वासाला दुर्गंधी येऊ शकते. जर लाळ तयार होत नसेल तर त्यामुळे तोंडाला फोड येऊ शकतात आणि कधीकधी संसर्ग देखील होऊ शकतो. लाळ उत्पादनाच्या कमतरतेमुळे दात किडणे, पोकळी आणि हिरड्यांचे आजार होऊ शकतात.

रात्री तोंड कोरडे आणि तहान लागण्याची कारणे कोणती आहेत?

झोपण्यापूर्वी तुम्ही काय खाल्ले

तुम्ही झोपण्यापूर्वी जे खात आहात ते तहान लागण्याशी संबंधित असू शकते. काही खाद्यपदार्थ आणि पेये आहेत, ज्यामुळे तोंड कोरडे होते आणि जास्त तहान लागते. 

जर तुम्ही झोपण्यापूर्वी मसालेदार पदार्थ खात असाल तर त्यामुळे तुम्हाला रात्री तहान लागेल आणि झोप पुर्ण होत नाही. 

अल्कोहोल आणि कॅफिन देखील तोंडाला निर्जलीकरण करतात. यामुळे कोरडेपणा वाढतो आणि तुम्ही पाणी पिण्यासाठी रात्री अनेकदा उठता. म्हणूनच रात्रीच्या वेळी अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन कमी करावे किंवा टाळावे.

काही इलेक्ट्रोलाइट्स आणि एन्झाईम्स व्यतिरिक्त लाळ प्रामुख्याने पाण्यापासून बनलेली असते. जेव्हा तुम्ही दिवसभर पाणी पीत नाही, तेव्हा ते लाळ तयार करत नाही आणि तुमचे तोंड कोरडे होईल.

काही लोक झोपण्यापूर्वी भरपूर पाणी पितात, मग त्यांना पाणी प्यायला रात्री उठावे लागणार नाही. त्यामुळे तोंड कोरडे होणार नाही असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या सेवनाकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्हाला दिवसभरात किमान 3 लिटर पाणी पिणे आवश्यक असू शकते. दिवसभर पाण्याचे सेवन चांगले राहिल्यास तोंड कोरडे पडत नाही आणि तहानही लागत नाही. 

तोंड उघडे ठेवून झोपण्याची कारणे

झोपताना लोक नाकातून श्वास घेतात तर काही लोक तोंडातून श्वास घेतात. त्यामुळे तोंड कोरडे पडते आणि तहान लागते. अनेक वेळा अॅलर्जी किंवा सर्दीमुळे नाक बंद राहते, त्यामुळे तुम्हाला नाकातून श्वास घेता येत नाही.

रात्री तोंड कोरडे होणे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला स्लीप एपनिया आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. 

मधुमेह मेल्तिसमुळे जास्त तहान लागते. जेव्हा तुमचे शरीर साखरेवर योग्य प्रकारे प्रक्रिया करू शकत नाही, तेव्हा तुमचे मूत्रपिंड तुमच्या रक्तप्रवाहातून अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी जादा वेळ काम करतात. अशा स्थितीत तुमची किडनी जास्त लघवी तयार करते, ज्यामुळे तहान लागते. अशावेळी डॉक्टरांशी बोलावे आणि नियमितपणे औषध घ्यावी.

या व्यतिरिक्त जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादे औषध घेत असाल तर त्यामुळे देखील तुम्हाला रात्री पाण्याची तहान लागते आणि तोंड कोरडे होते. भरपूर पाणी प्यायल्यानंतरही तुम्हाला तहान लागली असेल आणि अनेकदा थकवा जाणवत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT