Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार

वातावरणातील बदलामुळे आपल्या शरीरात (body) देखील बदल (Changes) होतात.

दैनिक गोमन्तक

आजकाल दैनंदिन जीवन धावपळीचे आणि तणावपूर्ण झाले आहे. यामुळे स्वत: च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे वजनात वाढ होताना दिसत आहे. सध्या मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे अशा वातावरणात (Atmosphere) आपल्या आहारात तसेच व्यायामत कोणता बदल करावा हे समजून घ्यायला हवे. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर (Health) होतो. तसेच वजन कमी करण्यास कोणती मदत मिळू शकते याबद्दल माहिती करून घेऊ.

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ऋतुनुसार खाणे , पिणे , झोपणे , व्यायाम करणे याबाबत माहिती दिली आहे. कारण वातावरणातील बदलामुळे आपल्या शरीरात देखील बदल होतात. पावसाळ्यात (Monsoon) अनेक लोकांना वाताचा त्रास होतो. तसेच पित्ताचा देखील त्रास उद्भवतो. या बदलामुळे स्थूल लोकांमध्ये गुडगेदुखी, पायाची टाच दुखणे किंवा गॅस , पचनसंस्थेच्या समस्याना तोंड द्यावे लागते. कारण या वातावरणात पचनक्रिया मंद झालेली असते. यामुळेच पचायला हलका आहार घ्याव. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील बऱ्याच आजारांपासून सुटका मिळून शरीर उत्साही राहते.

कोणता आहार घ्यावा -

पावसाळ्यात (Monsoon) नियमितपणे पाणी उकळून थंड करून प्यावे. दिवसभर कोमट पाण्याचे सेवन केले तर उत्तमच आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. जेवणानंतर लगेच पाणी ना पिता अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे. जेवण करतांना थोडे थोडे पाणी प्यावे ,परंतु एकदम पोटभर पाणी पिणे टाळावे. कारण जेवण केल्यानंतर लगेच पाणी प्यायलयास वजनात वाढ होऊ शकते.

आरोग्य तज्ञानुसार, गोड पदार्थ, आंबट, यासारख्या गुणांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यास लाभदायी असते. केवळ स्थुल लोकांनी गोड पदार्थ खाणे टाळावे. यात साखर , पेढा , दुधापासून बनवलेले पदार्थ यासारखे पदार्थ खाणे टाळावे.

दुपारच्या जेवणात फुलके किंवा ज्वारीची भाकरी खावी. यासोबत दूध,भेंडी, दोडका, हिरवे मुग, अशा भाज्यांचे सेवन करावे. तसेच पुदिना चटणी, काकडी-टोमॅटोची कोशिंबीर तांदूळ भाजून घेतलेला भात , थोड्या प्रमाणात असे जेवण घ्यावे. यात मधुमेह असलेल्या लोकांनाई भाताचे सेवन करणे टाळावे. जेवणानंतर ताक पिणे नेहमीच लाभदायी असते. यात काळे मीठ आणि काळी मिरपूड घालून घ्यावे. रात्रीचे जेवण 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान घ्यावे. याचे कारण म्हणजे सूर्यास्तानंतर पचनक्रिया मंदावते. यावेळी जेवणात सूप घेणे लाभदायी ठरू शकते.

दुधी भोपल्याचा सूप घेतल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते . जर अधेमधे भूक लागलीच तर तुम्ही राजगीर लाही सारख्या पदार्थांचे सेवन करू शकता. तसेच संत्रे, मोसंबी ,डालिंब यासारख्या फळांचे सेवन देखील करू शकता. रात्री जास्त वेळ जागरण करणे टाळावे. असे केल्यास शरीरास फायदा होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT