निर्माल्य कलश Dainik Gomantak
लाइफस्टाइल

पर्यावरणाचीही काळजी घ्या

निर्माल्य खत करण्यासाठी निर्माल्य कलशात ठेवावं.

दैनिक गोमन्तक

आपले सर्व सण-उत्सव हे पर्यावरण (Environment) रक्षणासाठीच असतात. त्यामुळे कोणताही सण साजरा करताना प्रदूषण होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशपूजन करण्यास सांगण्यात आलं आहे. गणेशमूर्ती (Ganesha idol) ही मातीचीच हवी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असतं. त्यामुळं पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मातीच्या गणेशमूर्तीचं पूजन करण्यास सांगण्यात आलं आहे. पूर्वी लोकसंख्या कमी होती. त्यावेळी गणेशमूर्तींची संख्याही कमी होती, सध्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच गणेश उपासकांची संख्याही वाढली आहे. गणेशमूर्तींची संख्या वाढल्यानं पर्यावरणाचा (Environment) प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचं विसर्जन करून जलप्रदूषण टाळणं गरजेचं आहे. निर्माल्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. निर्माल्यावर पाणी शिंपडलं, की त्याचं विसर्जन होतं. मग ते निर्माल्य खत करण्यासाठी निर्माल्य कलशात ठेवावं. कोणत्याही परिस्थितीत निर्माल्य पाण्यात टाकू नये. जलप्रदूषण (Water pollution) होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. गणेशोत्सवात ध्वनिवर्धकाचा वापर हा संयमाने करावा. गणेशपूजनानंतर म्हणायची आरती मधुर आवाजात म्हणावी. गणेशोत्सवामुळं ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी. सध्या बाजारात मिळणारा कापूर व अगरबत्त्या या केमिकलपासून (Chemical) बनविलेल्या असतात. त्यांच्या धुरामुळे अनेकांना श्वसनविकार उद्भवतात. वायूप्रदूषण (Air pollution) होणार नाही याची काळजी घ्यावयास हवी. आपण आनंद घेत असताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी.

सध्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगामुळं अनेक भारतीय लोक परदेशांत स्थायिक झाले आहेत. जगाच्या प्रत्येक देशात भारतीय लोक गेले आहेत. तिथंही ते गणेशोत्सवासारखे सण साजरे करत आहेत. त्यामुळं भारताचा पारंपरिक गणेशोत्सव आता ‘ग्लोबल’ झाला आहे. परदेशांतले नागरिकही भारताचा गणेशोत्सव सोहळा पाहायला आणि त्यात सहभागी होण्यासाठी भारतात येत असतात. अनेक धर्मांचे लोकही या उत्सवात सहभागी होत असतात. म्हणून या पारंपरिक गणेशोत्सवाला देखणं, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक स्वरूप येणं आवश्‍यक आहे आणि ती आपली सर्वांची जबाबदारी आहे.

स्वातंत्र्य चळवळीत स्वराज्यप्राप्तीसाठी, जनजागृतीसाठी उपयोग झालेल्या या गणेशोत्सवाला आता मात्र आरोग्य, देशप्रेम, लोकशिक्षण, स्वच्छता प्रबोधन, निसर्गरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग करून घ्यायला हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

SCROLL FOR NEXT