Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Happy Relationship Tips: जोडीदार निवडताना 'ही' गोष्ट तपासणे महत्वाचेच

दैनिक गोमन्तक

Happy Relationship Tips: आयुष्यात आपले काही निर्णय आपल्यासाठी महत्वाचे असतात. शिक्षण, नोकरी यासारखेच आपला जोडीदारदेखील महत्वाचा ठरतो. त्यामुळे जोडीदार निवडताना काही काळजी घणे महत्वाचे ठरते.

१. तुमच्यामध्ये काही गोष्टी कॉमन असू द्या

आपला जोडीदार निवडताना ही काळजी घेतली पाहिजे की तुमची काही तत्वे, छंद, तुमचे व्यक्तीमत्व, ध्येय काहीप्रमाणात सारखे असू द्या. भविष्यात याचा तुमच्यावर, तुमच्या नात्यावर फरक पडतो.

तुम्ही एकमेकांचे ध्येय गाठण्यात एकमेकांना साथ देण्यासाठी सक्षम असल्याचा विश्वास वाटत असेल तरच जोडीदार निवडा. तुम्हाला तुमचे नाते आयुष्यभरासाठी हवे असेल तर या गोष्टी तुम्ही आधीच समजून घ्यायला हव्यात किंवा या गोष्टी तपासणे महत्वाचे ठरते.

२. तुमच्या जोडीदाराला गृहीत धरु नका

अनेकदा नात्यात आपल्या जोडीदाराला गृहीत धरले जाते. त्यामुळे भांडण, वाद होण्यास सुरुवात होते. प्रत्येकवेळी तुम्ही समोरच्याला न विचारता प्लॅन बनवत असाल किंवा त्यांचे निर्णय पण तुम्हीच घेत असाल तर तुमचे नाते बिघडू शकते.

जर तुमच्या जोडीदाराला तुम्हाला भेटायची इच्छा नसेल तर किंवा तुम्हाला पाहायची इच्छा नसेल तर तुम्ही ते तुम्हाला तुम्ही म्हणाल त्यावेळी ते भेटतील किंवा तुमच्याशी बोलतील या गोष्टींचा आग्रह करु नका. याबाबतीत त्यांना गृहीत धरु नका. त्यांना काय वाटतं, ते काय करु इच्छितात, त्यांचं काय मत आहे हे त्यांच्याशी बोलून ऐकून घ्या, त्यांचे निर्णय तुम्ही थोपवू नका.

३. एकमेकांना सर्वस्व मानू नका

अनेकदा आपण पाहतो, अनेक जोडपी एकमेकांना आपले सर्वकाही असल्याचे म्हणत असतात. सर्वस्व असल्याचे म्हणतात. हीच नाती पुढे जाऊन तुटतात.

एकमेकांना सर्वस्व मानून मर्यादित राहण्यापेक्षा त्याच्यापलीकडे काही नाती जोडा. मित्रपरिवार तयार करा. फक्त तुम्ही दोघेच एकमेकांसाठी असणार असाल तर अशी नाती फार कमी काळ टिकतात.

४. दररोज छोट्या छोट्या गोष्टीतून आपले प्रेम व्यक्त करा

काही छोट्या गोष्टी दरोरज करण्यातून किंवा म्हणण्यातून आपले प्रेम व्यक्त करा. तुमची तुमच्या जोडीदारासोबत असलेली कृतज्ञता व्यक्त करा. यातून समोरचा व्यक्ती नाते( Relationship ) मजबूत होण्याकडे आणि आनंदी राहण्याकडे लक्ष देतो.

५. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या गरजा भागवत आहात याची काळजी घ्या

प्रेम फक्त बोलण्यातून सिद्ध होत नाही. तुम्ही एकमेकांच्या गरजा पूर्ण करत आहात का याच्याकडेही लक्ष दिले पाहिजे. जर त्या गरजा पूर्ण नाही झाल्या तर अशी नाती मरुन जातात.

योग्य जोडीदार भेटला तर आयुष्याचे कल्याण होते असे अनेकदा आपण ऐकतो. कारण आयुष्यातल्या अनेक प्रसंगी त्यांची साथ, त्यांचे वागणे-बोलणे, आपल्या अप्स अँड डाऊन मध्ये त्यांनी दिलेली साथ महत्वाची ठरते. त्यामुळे जोडीदार निवडताना काही काळजी घेणे आणि निवडल्यानंतर त्यांच्याशी वागताना काही गोष्टीबाबत लक्षपूर्वक निर्णय घेणे महत्वाचे ठरते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT