Hair Fall Tips in Summer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

केस गळतीचं प्रमाण होईल कमी; आहारात समाविष्ट करा 'या' गोष्टी

Hair Fall Tips in Summer : केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करावा लागेल

दैनिक गोमन्तक

Hair Fall Tips in Summer : उन्हाळ्यात, कडक सूर्यप्रकाश, धूळ, वारा यामुळे कोरडे, निर्जीव आणि केसांची समस्या सतावते. उष्णतेचा केवळ शरीरावरच नाही तर त्वचा आणि केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. उन्हाळ्यात केस गळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे टाळूला येणारा घाम. त्यामुळे केसांमध्ये ओलावा राहून केस तुटणे, गळणे सुरू होते.

त्यामुळे जर तुमचे केसही उष्णतेमुळे गळत असतील आणि तुम्हाला ते कमकुवत होण्यापासून वाचवायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आरोग्याची जशी काळजी घेतो तशीच तुमच्या केसांची काळजी घ्या. केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, पण तुम्हाला तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करावा लागेल, ज्यामुळे केसगळती तर थांबतेच पण केस मजबूत होण्यासोबतच शरीरही निरोगी राहते. (Hair Fall Tips in Summer)

1. दही

उन्हाळ्यात दह्याचा आहारात समावेश करावा. कारण दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन-बी12, व्हिटॅमिन-बी2, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसोबत प्रोटीन आढळते. जे केस आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.

2. टरबूज

टरबूज हे उन्हाळ्याच्या दिवसात येणारे हंगामी फळ आहे. टरबूज शरीराला हायड्रेट ठेवते आणि वजन कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. याशिवाय तुम्ही टरबूज खाऊन केस मजबूत करू शकता.

3. बेरी

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे उन्हाळ्यात केसांचे नुकसान टाळता येते.

4. आंबा

आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. भारतात आंब्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आरोग्यासोबतच आंब्याच्या चवीमुळे केसगळती रोखण्यासही मदत होते. आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम आणि फोलेट केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT