Food Poisoning  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Food Poisoning वर 'हे' पदार्थ गुणकारी

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यात अनेक लोकांना पोटासंबंधीत आजार उद्भवतात. कारण अनेक लोक खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. उन्हाळ्यात (Summer) अन्न लवकर खराब होते. जर तुम्ही उन्हाळ्यात लवकर खराब होणाऱ्या पदार्थांचे सेवन केले तर त्या अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे उलट्या, मळमळ, पोटदुखी, जुलाब यासारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे उन्हाळ्यात खाण्या-पिण्याच्या गोष्टींबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

आल:

अन्नातून विषबाधा झाली असल्यास घरगुती उपाय म्हणून आल्याचा वापर करू शकता. एक चमचा किसलेले आल, एक कप पाण्यात उकळावे. त्यात चवीनुसार मध किंवा साखर घालावे.. अन्नातून विषबाधा झाल्यास तुम्ही दिवसातून दोनदा याचे सेवन करू शकता. यामुळे तुमचा त्रास कमी होऊ शकतो.

दही आणि मेथी:

अन्नातून झालेली विषबाधा दूर करण्यासाठी दही आणि मेथी हे अतिशय प्रभावी उपाय मानले जातात. यासाठी एक चमचा दही आणि मेथीचे दाण्याचे सेवन करावे.

लिंबू:

अन्नातून झालेली विषबाधा दूर करण्यासाठी लिंबू एक उत्तम उपाय मानला जातो. यासाठी एक चमचा लिंबाच्या रसात साखर मिक्स करून सेवन करावे. आपण त्यात थोडे पाणी देखील घालू शकता.

* केळी

अन्नातून झालेली विषबाधा दूर करण्यासाठी केळी हा एक चांगला उपाय आहे. केळीचे सेवन केल्याने पचन संस्था देखील सुरळीत कार्य करते. अन्न विषबाधा टाळण्यासाठी दररोज किमान एका केळीचे सेवन करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

SCROLL FOR NEXT