Car Care Dainik gomantak
लाइफस्टाइल

Car Care: गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त सामान भरल्यास येऊ शकतात 'या' समस्या

जर तुम्ही कारमध्ये खुप जास्त सामान किंवा लोक बसवले तर कारचे नकसान होऊ शकते. यामुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

care care tips disadvantages of car overloading read full story

आजकाल सर्वांकडे कार आहे. यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे सोयीस्कर झाले आहे. अनेक लोक कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे बसवतात किंवा जास्त सामान ठेवतात. परंतु असे केल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

गैरसोय होते

गाडीत जास्त सामान भरल्याने अनेक गैरसोयी होतात. उदाहरणार्थ, जर गाडीत जास्त प्रवासी बसले तर प्रवास करणे कठीण होते आणि गाडी चालवणे देखील कठीण होते. तसेच जास्त सामान ठेवल्यास देखील समस्या उद्भवू शकतात.

इंजिन आणि सस्पेंशन

कारमध्ये जास्त लोक बसल्यामुळे सस्पेशनवर दबाव वाढतो. त्यामुळे सस्पेशन बिघडण्याचा किंवा तुटण्याचा धोका असतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहनात जास्त सामान ठेवणे किंवा जास्त लोक बसणे याचा थेट परिणाम इंजिनवर होतो. कार ओव्हरलोड केल्याने त्याचे इंजिन खराब होऊ शकते.

बॉडीत होऊ शकते डॅमेज

कारच्या क्षमतेपेक्षा जास्त सामान किंवा माणसे भरली गेली तर त्याचा परिणाम बॉडीवर होतो. कारमध्ये बसवलेले चेसिस केवळ मर्यादित वजन वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. अशावेळी त्यावर जास्त भार पडल्यास नुकसान होण्याची शक्यता वाढते.

टायर खराब होणे

कोणत्याही कारसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची चाके आणि कोणत्याही कारमध्ये जास्त सामान ठेवले किंवा कारच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवले तर टायर खराब होऊ शकतात. ओव्हरलोडिंगमुळे टायर लवकर खराब होतात. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT