Buy this Things in Navratri  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri Tips : नवरात्रीमध्ये 'या' 5 गोष्टी अवश्य खरेदी करा; पैशांची होईल भरभराट

नवरात्रीच्या काळात काही वस्तू खरेदी करून घरी आणणे देखील शुभ मानले जाते.

दैनिक गोमन्तक

नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून या उत्सवाची सांगता 5 ऑक्टोबर, बुधवारी होणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानले जातात. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त अनेक विधी करतात. ठिकठिकाणी जत्रेचे आयोजन केले जाते.

असे मानले जाते की नवरात्रीच्या दिवसात केलेल्या कोणत्याही कामात माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपली कामे पूर्णत: सफल होतात. नवरात्रीच्या काळात काही वस्तू खरेदी करून घरी आणणे देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते.

1. चांदीच्या वस्तू :

असे मानले जाते की चांदीची कोणतीही वस्तू समृद्धीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की नवरात्रीमध्ये चांदीची कोणतीही वस्तू घरात आणल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते. परंतु, चांदीची कोणतीही वस्तू वापरण्यापूर्वी ती वस्तू माँ दुर्गाला अर्पण करावी.

2. मातीचे घर :

नवरात्रीच्या दिवसात मातीचे छोटे घर खरेदी करा किंवा घरी तयार करा. यानंतर ते घर देवीजवळ ठेवा. नऊ दिवस माता दुर्गेची पूजा करा आणि ते घर तिथे ठेवा. असे मानले जाते की याने तुमची मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता निर्माण होते आणि घरात पैशाची कमतरता भासत नाही. याशिवाय कुटुंबात राहणाऱ्या सर्व सदस्यांमधील दुरावा संपतो.

3. शृंगाराचे सामान :

स्त्रियांना शृंगार करणे अतिशय आवडते. आणि प्रत्येक strस्त्री ही देवीचे रूप असते. अशा परिस्थितीत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीजवळ लाल चुनरीसह सुवासिनीचे वाण ठेवावे. असे केल्याने पतीचे वय वाढते. त्याचे जीवन संकटमुक्त होते. वैवाहिक जीवन देखील चांगले राहते. अविवाहित मुलींनीही दुर्गादेवीची पूजा केली तर त्यांना त्यांच्या मनासारखा वर मिळतो.

4. मौली :

जर तुमच्या मनात एखादी विशेष इच्छा असेल, काही खरेदी करायचे असेल, तर नवरात्रीच्या काळात तुम्ही ती नक्कीच खरेदी करून आणा. मॉलीच्या धाग्यात नऊ गाठी घाला आणि देवीजवळ अर्पण करा. यानंतर, आपल्या इच्छेसाठी त्यांना प्रार्थना करा. तुम्हाला देवीचा आशीर्वाद नक्कीच मिळेल आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.

5. पताका :

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल रंगाचा त्रिकोणी पताका खरेदी करून आणा. नवरात्रीच्या काळात हे खूप शुभ मानले जाते. वास्तविक, पताकाचा अर्थ विजयाचे लक्षण आहे. नवरात्रीच्या काळात नऊ दिवस हे पताका पूजेच्या घरात ठेवावे. त्या पताक्याचीही पूजा करावी. असे केल्याने घरात सुख-शांती राहते आणि भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Inspection: अन्न सुरक्षेवर भर; 'एफडीए'कडून 29.09 लाखांचा दंड वसूल, 325 हून अधिक आस्थापनांची पाहणी

VIDEO: 'टोमणे पचवता येत नसतील तर...' यशस्वी जयस्वालच्या कृत्यावर दिग्गज क्रिकेटपटू भडकला; मैदानावरील राड्यानंतर सुनावले खडे बोल

Colvale jail: कोलवाळ जेलच्या भिंतीआड 'काळाबाजार'? कैद्यांना मद्य, अमली पदार्थ, स्मार्टफोन अन् परफ्युमचा 'स्पेशल सप्लाय'; धक्कादायक माहिती समोर

Guinea Landfill Collapse: पहाटेची झोप ठरली अखेरची! कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू; गिनी देशातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT