Bad Effects of Food Waste in Plate
Bad Effects of Food Waste in Plate Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Food Waste : तुम्हालाही ताटात अन्न टाकायची सवय असेल तर हे वाचाच; अन्नाचा अपमान पडेल महागात

दैनिक गोमन्तक

आपल्या देशात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत. लोक अनेक गोष्टींचा संबंध शुभ आणि अशुभ चिन्हांशी जोडतात. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ किंवा खाद्यपदार्थांबाबतही काही ओळख आहे. अन्न हे देवी अन्नपूर्णेचे वरदान मानले जाते. शास्त्रानुसार ज्या घरात अन्नाचा अपमान होतो त्या घरात माता अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी वास करत नाहीत.

म्हणूनच असं म्हणतात की चुकूनही अन्नाचा अपमान करू नये. याच कारणामुळे शास्त्रांमध्ये जेवणाशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्यास घरात अन्नाची कमतरता भासत नाही. शास्त्रानुसार ताटातअन्न कधीही सोडू नये. असे केल्याने माता अन्नपूर्णा आणि लक्ष्मी क्रोधित होतात. चला जाणून घेऊया ताटात अन्न का टाकू नये.

ताटात अन्न शिल्लक टाकण्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

  • ज्योतिषशास्त्रानुसार ताटात उष्टे अन्न सोडणे हे देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचा अपमान मानले जाते. असे केल्याने आर्थिक स्थिती कमकुवत होते. त्याच वेळी घरी येणारी लक्ष्मी रागावते आणि निघून जाते.

  • ताटात अन्न टाकल्याने मुले अभ्यासात कमकुवत होतात. हळुहळु मन अभ्यासातून पूर्णपणे निघून जाते. त्यामुळे मूल जेवढे खाऊ शकेल तेवढेच सर्व्ह करावे.

  • ताटात अन्न सोडल्याने शनीचा प्रकोप होऊ शकतो. यासोबतच चंद्राची अशुभ दृष्टीही व्यक्तीच्या जीवनावर पडू लागते. चंद्राच्या अशुभ दृष्टीमुळे व्यक्तीला मानसिक आजारही घेरतात.

  • याशिवाय प्रवासादरम्यान अन्न टाकल्यास तुमचे काम कधीच होत नाही किंवा केलेले कामही बिघडू लागते.

  • ताटात अन्न टाकल्याने माणूस पापाचा भाग बनतो. म्हणूनच ताटातील अन्न जेवढे खाता येईल तेवढेच घ्यावे आणि अन्न वाया घालवू नये. काही कारणाने ताटात अन्न राहिल्यास हात जोडून माता अन्नपूर्णाची माफी मागावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT