Water Shortage in Valpoi Goa Dainik Gomantak
गोवा

सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर... म्हाऊस गावात पाण्याविणा नागरिकांचे हाल; मोर्चा काढण्याचा दिला इशारा

म्हाऊस गावातील देसाईवाडा परिसरात पाण्याची तीव्र टचाई; नागरिक हैराण

दैनिक गोमन्तक

Water Shortage Problem: म्हाऊस पंचायत क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावात नळाला पाणी नसल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. त्यात टॅंकर आठ दिवसातून एकदा येत असल्याने गावातील रहिवासी नाराज झाले आहे.

नदीचे पाणी सुध्दा आता आटले असून पाण्याविणा नागिरकांना दिवस काढावे लागत आहे. यावेळी वारंवार पाणी टंचाई असल्याची तक्रार संबंधीत खात्याला व पाणी सोडण्याऱ्या आॅपरेटरकडे केली होती. त्यानंतर एक दिवस पाणी सोडले जाते व टॅंकर पाठविला जातो, मात्र पुन्हा तोच प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.

काही वेळेला पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याचा प्रकारही इथे घडत असतो. काही घरे उंचावर असल्याने त्या घरांना पाणीच पोहतच नाही. तसेच टॅंकर नियमित येत नसल्याने महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. काही महिलांनी सांगितले की पाण्याच्या बाटल्या विकत आणून पाणी पिण्याची वेळ आलेली आहे.

यावेळी वाळपई पाणी पुरवठा कार्यालयावर गावातील महिलांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र कार्यालयात सहाय्यक अभियंता रोहिदास नाईक सुट्टीवर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. तिथे असलेले अधिकारी फक्त तोडगा काढण्याचे आश्वासन देतात.

यावेळी देसाई वाडा व पंचायत वाड्यावरील सुमारे 20 महिलांची उपस्थिती होती. गावातील महिलांतर्फे तक्रारीचे निवेदन कार्यालयात देण्यात आले आहे. जर सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर गावातील सर्व महिलांतर्फे कार्यालयावर पुन्हा मोर्चा घेऊन येणार, असा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lepidagathis Clavata: म्हादई खोऱ्यातल्या चोर्ला घाटानंतर 166 वर्षांनी फुललेली वनस्पती, 2024 मध्ये आढळली आंबोली परिसरात

Taleigao: वांगी, आंबा, तांदूळ, काजू बोंडेसाठी GI दर्जा मिळालेले; विशिष्ट मातीच्या गुणधर्माचे 'ताळगाव'

Goa Budget: विकासकामांचा धडाका, आश्वासनांची 99% अंमलबजावणी सुरू; फेब्रुवारीत गोव्याचा अर्थसंकल्प येणार?

Goa Third District: तिसरा जिल्हा झाला; पण 'रविं'चे स्वप्न पूर्ण झाले?

Kushavati District Goa: तिसऱ्या जिल्ह्यावरून वाद थांबेना! ‘कुशावती’चे मुख्यालय केपे नको; काणकोणवासीयांचे मत

SCROLL FOR NEXT