Water Shortage  Dainik Gomantak
गोवा

Water Shortage: ...यामुळे म्हापशाच्या तीन प्रभागात पाणीटंचाई

म्हापसा येथील शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या कामावेळी साबांखाची जलवाहिनी फुटल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.

दैनिक गोमन्तक

Water Shortage: म्हापसा येथील शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या कामावेळी साबांखाची जलवाहिनी फोडल्याने 10, 12 व 19 या प्रभागांतील काही नागरिकांना मागील आठवड्याभरापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची कैफियत मांडत स्थानिकांनी आज शनिवारी या प्रकल्पाच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.

म्हापशात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असून या कामावेळी बेशिस्तपणे खोदकाम केले जाते. परिणामी जलवाहिनी बाधित केली जाते. त्यामुळे नळांना पाणी येत नाही, अशी तक्रार करीत दत्तवाडी परिसरातील लोकांनी या भूमिगत वीजवाहिन्यांचे कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत संताप व्यक्त केला.

पाण्याच्या समस्येविषयी साबांखा तसेच वीज विभागाकडे विचारपूस करण्यास गेल्यास तेथील अधिकारी असमाधानकारक उत्तरे देत आपली जबाबदारी झटकताहेत. मग सर्वसामान्यांनी कुणाकडे जावे?

उद्या सकाळी नागरिकांनी कायदा हातात घेतल्यास त्यास जबाबदार कोण? असे सवाल रमेश नाईक यांनी उपस्‍थित करून त्यांनी प्रशासनाच्या एकंदरीत भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एक-दोन दिवस जनता कळ सोसू शकते.

मात्र आठवड्यापेक्षा जास्त दिवस उलटूनही ही समस्या ‘जैसे थे’ आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील याकडे डोळेझाक करताहेत. मग अशा लोकप्रतिनिधींची गरजच काय, असा संतप्‍त सवालही नाईक यांनी केला.

दरम्‍यान, ब्रिजेश म्हापसेकर, संजय विर्नोडकर, संदीप म्हापसेकर व महाबळेश्वर पार्सेकर हे देखील यावेळी उपस्थित होते.

लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करू

भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर ए. के. चंद्रन म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी आम्ही या भागात काम सुरू केले आहे. मात्र स्थानिक मागील दहा दिवसांपासून पाणी येत नाही असे सांगताहेत. सध्या खोदकाम करून कुठे गळती आहे का, हे तपासले जाणार आहे.

जर सर्व काही व्‍यवस्‍थित असेल तर ती वाहिनी दुरुस्त करुन लोकांचा पाणीपुरवठा सुरळीत करू.अन्यथा दुसरी वाहिनी बायपास करून पुरवठा उपलब्ध करून देणार आहे.

भूमिगत वाहिन्‍यांचे काम सुरू आहे. आमचा विकासकामांना विरोध नाही, परंतु कामाच्या ठिकाणी जबाबदार व्यक्ती किंवा अधिकारी उपस्‍थित राहणे गरजेचे आहे. कारण कामगारांकडे ही मंडळी फक्त यंत्रसामग्री सोपवितात आणि नंतर कामगार हवे तसे खोदकाम करतात. त्‍यामुळे अनेकदा जलवाहिनी फोडली जाते. परिणामी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. - मंगेश बिचोलकर, ग्रामस्‍थ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Divyang Rights Association: ग्रामपंचायतींत दिव्यांग प्रतिनिधी नेमणं बंधनकारक, राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘बीडीओं’ना निर्देश

Strait Of Hormuz: होर्मुझच्या समुद्रधुनीवरुन अमेरिका-इराणमध्ये पुन्हा ठिणगी! ट्रम्पचा फेटाळला प्रस्ताव; जागतिक व्यापारावर टांगती तलवार कायम

Sal Panchayat: साळमधील रस्त्यांवर मृत्यूचे सापळे? जलवाहिनीच्या कामामुळे उखडले रस्ते; पावसाळ्यात माती खचून मोठ्या अपघाताची भीती

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 10 वर्षांऐवजी दर 5 वर्षांनी पगारवाढीचा प्रस्ताव; आठव्या वेतन आयोगासमोर महत्त्वाची मागणी

Mapusa Road Repair: निवडणुका जवळ येताच म्हापशात विकासाचा 'पाऊस', रस्ते कामाला प्रारंभ; 15 वर्षांपासून तुंबलेली गटारे 8 दिवसांत साफ

SCROLL FOR NEXT