Goa History Dainik Gomantak
गोवा

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वेश बोरकर

विजयनगरचा राजपुत्र कुमार कंपण्णा एक प्रसिद्ध योद्धा होता. दक्षिण भारतातील सर्वांत शूर राजपुत्रांपैकी एक, विजयनगरचा सम्राट बुक्करायाचा(पहिला) मुलगा, कुमार कंपण्णा १४व्या शतकातील सर्वांत महत्त्वाकांक्षी, प्रतिभावान, शूर आणि उदार योद्धा होता. विजयनगरचा सम्राट बुक्करायाचा उद्देश दक्षिण भारतातील शक्तिशाली सरदारांचा नाश करून त्याच्या साम्राज्याच्या प्रसारासाठी मार्ग प्रशस्त करणे हे होते. या सरदारांचा व इतर रायांचा यशस्वीपणे पराभव करून, त्याने आपला मुलगा कुमार कंपण्णा याला राज्याच्या तमिळ जिल्ह्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले. यावेळी विजयनगर साम्राज्याचा थेट संबंध मदुराईच्या सल्तनतीशी आला. १३७०मध्ये मदुराईवर स्वारी करण्यासाठी कुमार कंपण्णा यांची नियुक्ती त्याचे वडील व विजयनगरचा सम्राट, बुक्कराया (पहिला) यांनी केली होते.

तामिळनाडूतील पूर्वीच्या दक्षिण अर्कोट जिल्ह्यातील जिंजीपासून सुरू झालेल्या या सैन्याने तिरुचिरापल्लीजवळील समयापुरम येथे मदुराई सल्तनत सैन्याचा पराभव केला. सैन्याने मदुराईच्या दिशेने कूच केले जेथे तिरुचिरापल्ली आणि मदुराईदरम्यान एके ठिकाणी लढाई झाली ज्यामध्ये मदुराईचा सुलतान पराभूत झाला आणि मारला गेला. काही उपलब्ध स्रोतांनुसार, सुलतानचा मृत्यू हे युद्धाच्या समाप्तीचे कारण नव्हते. त्याचे काही लोक मदुराईला पोहोचले होते, त्यांनी स्वतःला तिथे कोंडून घेतले होते, ते इतक्या सहजपणे हार मानण्यास तयार नव्हते. तथापि, कुमार कंपण्णाने मदुराईला वेढा घातला आणि भयंकर चकमकीनंतर हे शहर विजयनगर सैन्याच्या ताब्यात गेले. अशा प्रकारे चाळीस वर्षांच्या शासनानंतर मदुराईची सल्तनत संपुष्टात आली.

विजयनगरचे साम्राज्य गोव्याच्या उत्तरेपासून कन्याकुमारीपर्यंत पसरले होते व तमिळ प्रांत कुमार कंपण्णा यांच्या ताब्यात आला होता जो एक प्रसिद्ध योद्धा आणि हुशार प्रशासक होता. विविध ठिकाणी सापडलेले त्यांचे शिलालेख त्यांच्या आधिपत्याखालील प्रशासकीय संस्थेचे वर्णन करतात तसेच मंदिर प्रशासन आणि धार्मिक विधींच्या पुनर्रचनेतील त्यांच्या भूमिकेचे वर्णन करतात. अनेक मंदिरे जी एकतर बंद पडली होती किंवा अगदी दुर्लक्षित अवस्थेत होती, ती कुमार कंपण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा उभारण्यात आली, उघडण्यात आली. जी दुर्लक्षित होती त्यांची दुरुस्ती करण्यात आली. सण आणि दैनंदिन उपासनेसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आणि त्यासाठी जमीन आणि पैसा दान करण्यात आला.

मंदिर प्रशासनाच्या प्रभारी अधिकाऱ्यांपैकी एक गोपण्णा होता, ज्याला नंतर जिंजीचा शासक म्हणून नियुक्त करण्यात आले. कुमार कंपण्णासारखे अधिकाऱ्यानेच श्रीरंगम भागातील मुस्लीम शासकाचा पराभव करून भगवान रंगनाथाची (श्रीरंगम मंदिराची) मूर्ती तिरुमला येथून परत आणली. श्रीरंगमला आणि या देवतेच्या पुनर्संवर्धनासाठी श्रीरंगनाथाचे मंदिर हे असेच एक भव्य मंदिर होते. भारतातील सर्वांत आदरणीय मंदिरांपैकी एक, चौदाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मलिक काफूरसारख्या दिल्ली सल्तनतच्या सरदाराने अनेकदा लुटले होते. १३२३मध्ये उलुग खान (मुहम्मद बिन तुघलक) याच्या नेतृत्वाखाली आक्रमणानंतर, भक्तांना विष्णू आणि लक्ष्मीचे विग्रह मूर्ती वाचविण्यात यश आले. परंपरा सांगते की हजारो भाविकांनी अदम्य धैर्याने मंदिराचे रक्षण केले.

या आक्रमणानंतर ही जमीन दिल्ली सल्तनतच्या ताब्यात आली. श्रीरंगनाथाला लुटणे आणि मीनाक्षी मंदिरासारखी मदुराईची इतर अनेक भव्य मंदिरे लुटणे म्हणजे संपूर्ण संस्कृतीचा विध्वंस. हा प्रदेश आता सल्तनतच्या ताब्यात होता. प्रदेशाचा गव्हर्नर, जलालुद्दीन अहसान खान/ हसन खान यांनी १३३५मध्ये मदुराईच्या सल्तनतीला दिल्ली सल्तनतपासून स्वतंत्र घोषित केले. हा प्रदेश एका लुटारूकडून दुसऱ्याकडे गेला. त्याने स्वतःला दिल्ली सल्तनतचा खरा उत्तराधिकारी असल्याचे सिद्ध केले. भांडणाच्यावेळी राज्यकर्त्यांना जवळजवळ नेहमीच मारले गेले. त्यांपैकी बहुतेकांना बदनाम केले गेले आणि अनेकांना क्रूरतेने मारले गेले. ज्याचा धक्का कधीकधी त्यांच्या सह-धर्मीयांनाही बसला.

इब्न बतूता, एक प्रसिद्ध मोरोक्कन प्रवासी १३४०च्या दशकात मदुराईच्या सुलतानांपैकी एक, गियासुद्दीन मुहम्मद दामघानी याच्या काही अमानुष क्रूरतेचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. त्याने आपला हिशोब या शब्दांत दिला आहे;

‘हिंदू कैद्यांना चार भागात विभागले गेले आणि त्यांना चार दरवाजापर्यंत नेले गेले. तेथे, त्यांनी वाहून नेलेल्या खांबावर, कैद्यांना वधस्तंभावर खिळे मारण्यात आले. त्यानंतर, त्यांच्या पत्नींना ठार मारले गेले आणि त्यांचे केस या फिकटांना बांधले गेले आणि त्यांची प्रेत तिथेच टाकली गेली. मग, छावणी उभारली गेली आणि त्यांनी दुसऱ्या जंगलातील झाडे तोडण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या नंतरच्या हिंदू कैद्यांनाही अशीच वागणूक दिली गेली. हे लज्जास्पद वर्तन आहे. या साठीच देवाने घियासुद्दीनचा मृत्यू लवकर केला’.

मदुराईचे पारंपरिक राजे, पांड्यांचे राज्य यामुळे संपले. शतकानुशतके या भूमीचे पालनपोषण करणाऱ्या स्थानिक राज्यकर्त्यांची हिंसकपणे हकालपट्टी करण्यात आली. तामिळकमच्या दक्षिणेकडील भागावर पांड्यांनी अनादी काळापासून राज्य केले होते. इतर दोन राज्यकर्त्यांसह ते राज्य करताना आपल्याला आढळतात;

अगदी सुरुवातीच्या तमिळ काव्यातही चोल आणि चेरा, म्हणजे संगम साहित्याचा विशाल कोश. प्राचीन भारतीय इतिहासातील जवळजवळ सर्व सामान्य परदेशी स्रोत - ग्रीक, रोमन, अगदी लॅटिनदेखील त्यांचा उल्लेख करतात. सम्राट अशोकाच्या आज्ञेतही पांड्यांचा उल्लेख आहे. या राज्याचा इतिहास किमान चौथ्या शतकापूर्वीचा आहे. मदुराई हे प्राचीन शहर पांड्यांच्या राज्याइतकेच जुने आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT