Vijay Sardesai's Facebook account hacked Dainik Gomantak
गोवा

विजय सरदेसाई यांचे फेसबुक अकाऊंट हॅक; विरोधकांवर निशाणा

विजय सरदेसाई यांची या प्रकाराबाबत विरोधकांवर टीका: पोलिसांत तक्रार दाखल

दैनिक गोमन्तक

Vijai Sardesai: विधानसभा मतदानाला गोव्यात अवघे काही तास राहीलेले असताना मतदानाआधी प्रचंड राजकीय रणधुमाळी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. एकीकडे काल एका स्टींग ॲापरेशनच्या माध्यमातून काही उमेदवार दुसऱ्या पक्षांत जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यातच आता गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक (Hack) झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

यासंदर्भातील माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. दरम्यान त्यांनी तत्काळ या प्रकाराबद्दल पोलिस तक्रार नोंदवली असून फेसबुकच्या टीमला देखील याबाबत सूचित केले आहे. त्यांच्या अकाऊंटवरून जर काही गैर संदेश आला असल्यास त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. या घटनेबाबत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. असे घाणेरडे राजकारण करून अपप्रचार केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगातर्फे उद्या पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी पूर्णपणे तयारी करण्यात आली असल्याचे मत मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी व्यक्त केले. जनता नेमके कुणाला मतदान करणार हे आपल्याला 10 मार्चला कळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT