Police action Canva
गोवा

Goa Crime: मद्यपानानंतर कार चालवणाऱ्या कोल्हापूरच्या चालकाला कोर्टाचा दणका, एवढ्या कालावधीसाठी परवानाच निलंबित

Drink And Drive Case: संशयितावर मोटार वाहन कायदा कलम १८५ नोंदवून, त्याचा वाहन परवाना निलंबित करण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drink And Drive Case Tourist Driving License

म्हापसा : जेएमएफसी कोर्टाने मोटार वाहन कायदा कलम १८५अन्वये मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल कोल्हापूरच्या एका व्यक्तीला दोषी ठरवून १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच न्यायालयाने संशयिताचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला.

सविस्तर माहितीनुसार, वागातोर येथे २८ जुलै रोजी, रात्री ११.१८ वा.च्या सुमारास, अनुराग साळसकर (मूळ कोल्हापूर) ही व्यक्ती (एमएच १२ व्हीएफ ५०३५) क्रमांकाचे वाहन दारूच्या नशेत चालवताना पोलिस कर्मचाऱ्यांना आढळली होती. यावेळी पोलिसांनी संशयिताची ब्रेथलायझर चाचणी केली असता, त्याने दारूचे प्राशन केल्याचे आढळले. त्यानुसार, संशयितावर मोटार वाहन कायदा कलम १८५ नोंदवून, त्याचा वाहन परवाना निलंबित करण्यात आला.

दरम्यान, संशयित अनुराग साळसकर याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले व न्यायालयासमोर त्याने गुन्हा कबूल केला. युक्तिवाद ऐकल्यानंतर, म्हापसा जेएमएफसी कोर्टाने संशयितास दोषी ठरवले व मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५नुसार त्याला १० हजार रुपये दंड ठोठावला आणि हा दंड न भरल्यास दहा दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT