Goa Rain Accident Dainik Gomantak
गोवा

हवेली-कुर्टी येथे आंब्याचे झाड कोसळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

जखमी दुचाकीस्वार मनिषकुमार (वय 35) हा हवेली येथून आपल्या खोलीवर परतत असताना अचानक झाड कोसळले आणि तो झाडाच्या फांदीखाली दबला गेला.

दैनिक गोमन्तक

फोंडा : गोव्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी पावसामुळे पडझड होत आहे. फोंड्यात पाऊस आणि वाऱ्यामुळे पडझड सुरु असून आज शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास हवेली - कुर्टी येथे वाऱ्यामुळे आंब्याचे झाड अचानक कोसळून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

जखमी दुचाकीस्वार मनिषकुमार (वय 35) हा हवेली येथून आपल्या खोलीवर परतत असताना अचानक झाड कोसळले आणि तो झाडाच्या फांदीखाली दबला गेला. यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला असून, त्याला त्वरित उपचारासाठी फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ आणि तेथून पुढील उपचारासाठी बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान फोंडा मतदार संघाचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीची पाहणी केली. फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी झाड हटविले.

दरम्यान, मडगावात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडल्याने नगरपालिका अवरासह स्टेशन रोड परिसर आणि अन्य भाग पाण्याखाली गेल्याने लोकांची धांदल उडाली. नगरपालिका आवारात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वाटच नसल्याने या परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. नगरपालिका उद्यानाचा फुटपाथही पाण्याखाली गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT