Elections Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. सोमवारी 15 उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्याने आतापर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या 21 झाली आहे. शनिवार आणि रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने एकही अर्ज स्वीकारण्यात आला नाही. (Goa Assembly Election 2022)

28 जानेवारीला निवडणूक अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. दरम्यान, 26 तारखेला प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) सार्वजनिक सुट्टी आहे. यामुळे शेवटच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येणार, असे चित्र दिसत आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या (BJP) तिकीटावर सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर मगोपच्या चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. याशिवाय पाच अपक्ष आणि दोन काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांनीही निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आपली कागदपत्रे सादर केली आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी असून 14 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्चला जाहीर केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

बसमधील प्रवाशाकडे सापडले एक कोटी रुपयांची रोकड, गोव्यातून बंगळुरुला करत होता प्रवास, हवालाचा पैसा असल्याचा संशय

VIDEO: 'वो स्त्री है... कुछ भी कर सकती है', 7 महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिनं 145 किलो वजन उचललं, व्हिडिओ पाहून तुम्हीही मोटिव्हेट व्हाल

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT