Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोवा

आता राज्याची पाणीटंचाईची चिंता मिटणार; जलस्रोतमंत्र्यांची मोठी घोषणा

गोमन्तक डिजिटल टीम

Subhash Shirodkar : बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून लांबला व याचा फटका राज्यातील धरणांना बसला. पावसाने राज्याकडे पाठ फिरवल्याने राज्यातील सहा धरणांतील

पाणीसाठा घटला. राज्यात पावसाला सुरुवात होताच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्याला पाण्याची कमतरता भासत असल्याने बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात पाण्याची कमतरता होत असल्याने पाणी साठवण्यासाठी अधिकाधिक बंधारे बांधण्याची नितांत गरज आहे.

त्यामुळे डिसेंबर 2024 पर्यंत राज्यात नवे 100 बंधारे बांधण्याचा निर्णय जलस्रोत खात्याने घेतला असल्याची माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

डिसेंबर 2024 पर्यंत जलस्रोत खात्याने शंभर बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी साठवण्यासाठी अधिकाधिक बंधारे बांधण्याची नितांत गरज असल्याने जलस्रोत खात्याने हा निर्णय घेतला आहे.

बंधारे बांधण्याच्या कामास लवकरच सुरुवात करण्यात येईल आणि डिसेंबर 2024 पर्यंत त्यांचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT