Siddhi Naik Case Dainik Gomantak
गोवा

Siddhi Naik Case: मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने प्रकरण सीबीआयकडे

अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केली आहे. पणजी येथे आज आयोजित पत्रकार फरिषदेत चोडणकर यांनी ही मागणी केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: सिध्दी नाईक हिच्या मृत्यूला महिना उलटूनही तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी या प्रकरणी पारदर्शक तपास करुन नेमके कारण शोधून काढण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे सिध्दी नाईक प्रकरण (Siddhi Naik Case) सीबीआयकडे (CBI) द्यावे. अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केली आहे. पणजी येथे आज आयोजित पत्रकार फरिषदेत चोडणकर यांनी ही मागणी केली.

सिध्दी नाईक हिचा मृत्यू पाण्यात बडुन झाला की तिचा खून झालाय? हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने सिध्दी नाईक हिच्या घरच्याना न्याय मिळालेला नाही. मुख्यमंत्री स्वता या प्रकरणी तपासासाठी पुढाकार घेण्याचे सांगत होते. मात्र तसे काही झालेले नाही. त्यामुळे सिध्दी नाईक हिच्या मारेकऱ्याना सरकारमधील काही लोक वाचवत असल्याचा संशय बळावला आहे. असे सांगून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या प्रकरणी लवकर तपास न झाल्यास हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची शिफारस केली होती. त्याला आपला पाठिंबा असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. सिध्दी नाईक हिच्या मृत्यूचा योग्य तपास सीबीआय करु शकते. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणे गरजेचे असल्याची मागणी चोडणकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BCCI Central Contract: बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक! रोहित-विराटचं 'डिमोशन' तर शुभमन गिलचं टॉपचं प्रमोशन; सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर

India vs Pakistan: क्रीडाविश्वात हाय-व्होल्टेज ड्रामा! भारत-पाक महामुकाबल्यावर बहिष्काराचं सावट; आयसीसीनं धुडकावल्या मोहसीन नक्वीच्या मागण्या

Nerul: सफर गोव्याची! 400 वर्षांपूर्वी दैवत हलवून मांद्रे येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले; भक्तीरसातले 'नेरुळ'

Esakal: विश्वासार्हतेचा विजय! मराठी मनाचा मानबिंदू आता डिजिटलचाही 'राजा'; 5.6 कोटी युजर्ससह ई-सकाळ नंबर-1

Surya Grahan 2026: यंदाची महाशिवरात्री ठरणार 'टर्निंग पॉईंट'! सूर्यग्रहण कोणासाठी शुभ-अशुभ? 'या' 4 राशींच्या अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT