Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Panaji News: सुरबूस खाणां जेवणां’ पुस्तकाचे प्रकाशन ; आहार हे एक औषधच : श्रीपाद नाईक

आहार हे एक औषध असल्याचे ऋषि-मुनींनी म्हणून ठेवले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News: पणजी, आहाराच्या संबंधी आयुर्वेदात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलेले आहे. योग्य आहार घेतला, खाण्याबाबतचे सर्व नियम पाळले तर माणूस शंभर वर्षें सहज जगू शकतो यावर आयुर्वेदात नमूद केलेले आहे.

आहार हे एक औषध असल्याचे ऋषि-मुनींनी म्हणून ठेवले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण पाककृतीवर आधारित दंत सर्जन डॉ. रीना लवंदे यांनी लिहिलेल्या ‘सुरबूस खाणां जेवणां’ या पुस्तकाच्या प्रकाशन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी लेखिका डॉ. रीना लवंदे, प्रसिद्ध लेखक श्रीमती विनंती कासार, या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेले रमेश घाडी, सन्मानीय अथिती ऋषिकेश आठवले, एस. एल. बूक हाऊसचे प्रकाशक सागल लवंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विनंती कासार यांनी पुस्तकावर विचार मांडले, तर या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेले रमेश घाडी यांनी आपल्या जीवनातील आहाराचे महत्त्व विषद केले. लेखिका डॉ. रीना लवंद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी एस. एल. बूकहाऊस प्रकाशक सागर लवंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. सुरज लवंदे यांनी प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT