सत्तरी: शिकारीसाठी गेलेल्या वाळपईतील २२ वर्षीय युवकाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. नाणूस वाळपई येथील तीनजण शिकारीसाठी गेले असता ही घटना घडली. बंदुकीतून अचनाक गोळी झाडली गेली आणि युवकाला ती लागल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
समद खान (२२ वर्षे, नाणूस वाळपई) असे गोळी लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, वाळपईतील तीनजण पाटवळ सत्तरी येथे शिकारीसाठी गेले होते. दरम्यान, बंदुकीतून अचनाक गोळी झाडली गेल्याने यात समत खान या युवकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी त्याच्यासोबत असलेल्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.