Bhandari Samaj Dainik Gomantak
गोवा

Bhandari Community In Goa: ‘भंडारी’ नेतृत्वाला चेकमेट; आठ दिवसांत नवी समिती

Bhandari Samaj: बेतोडा - फोंडा येथे सनग्रेस गार्डन सभागृहात झालेल्या या स्नेहमेळाव्याला भंडारी समाज प्रतिनिधींची प्रचंड उपस्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: भंडारी समाजाची एकजूट कायम राखताना आठ दिवसांच्या आत समाजाचे ज्येष्ठ नेते आणि प्रतिनिधींची एक स्थायी समिती निवडावी आणि या समितीने अशोक नाईक व इतरांच्या समितीशी चर्चा करून समाजाच्या हितासाठी निर्णय घ्यावेत.

लवकरात लवकर समाजाची निवडणूक घेणे तसेच अशोक नाईक आणि इतरांनी समाजबांधवांना विश्‍वासात न घेता घटनेत जे नियम केले आहेत, ते बदलणे असे दोन महत्त्वाचे ठराव भंडारी समाज बांधवांच्या स्नेहमेळाव्यात घेण्यात आले. बेतोडा - फोंडा येथे सनग्रेस गार्डन सभागृहात झालेल्या या स्नेहमेळाव्याला भंडारी समाज प्रतिनिधींची प्रचंड उपस्थिती लाभली होती.

यावेळी भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा कृषिमंत्री रवी नाईक, माजी जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर, माजी सहकारमंत्री महादेव नाईक, विद्यमान आमदार वीरेश बोरकर, माजी आमदार लवू मामलेदार, दयानंद सोपटे, जयेश साळगावकर, किरण कांदोळकर यांच्यासह राजकीय व सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील इतर मान्यवरांचा समावेश या स्नेहमेळाव्यात होता.

स्नेहमेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रवी नाईक, संजीव नाईक, गुरुनाथ ऊर्फ भाई नाईक, दिलीप नाईक, रोहिदास नाईक, प्रकाश नाईक, रामकृष्ण नाईक यांनी समाजहितासाठी सर्व बांधव एकत्रित आल्याचे नमूद केले.

... तर समाजबांधवच योग्य निर्णय घेतील!

रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ सदस्यांच्या समितीने अशोक नाईक यांच्या समितीशी चर्चा करून लवकरात लवकर निवडणूक घेणे, तसेच समाजाच्या हिताच्या आड येणारे नियम काढून टाकण्यासाठी चर्चा करण्याचे महत्त्वाचे दोन ठराव यावेळी संमत झाले. अशोक नाईक तसेच इतरांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास समाज बांधवच पुढील निर्णय घेतील, असे यावेळी सांगण्यात आले.

रवींनी दाखविली ताकद...

भंडारी समाजाचे नेते तथा फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी या स्नेहमेळाव्यात आपली राजकीय ताकद दाखविली. रवी नाईक यांनी मारलेल्या एका हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातील भंडारी बांधव एकत्रित झाले. सनग्रेस गार्डनचे प्रशस्त सभागृह तुडुंब भरले होते. जागा उपलब्ध न झाल्यामुळे काही समाज बांधव सभागृहाबाहेर उभे होते.

समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांचे ‘नो कमेंटस्’

गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी या स्नेहमेळाव्यासंबंधी ‘नो कमेंटस्’ असे उत्तर दिले. भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु अधिक बोलण्यास अशोक नाईक यांनी नकार दिला. त्यांच्या या मौनाविषयी विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

समाज बांधवांची प्रचंड उपस्थिती

बेतोडा येथील भंडारी समाजाच्या या स्नेहमेळाव्याला समाज बांधवांची प्रचंड उपस्थिती लाभली. राज्यातील बाराही तालुक्यांमधील भंडारी समाजाचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश होता. खास करून महिला आणि युवा प्रतिनिधींचा भरणा मोठ्या प्रमाणात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT