RG Manoj Parab|Goa Politics  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : गोवा सरकारने म्हादई कर्नाटकला विकली; आरजीचे टीकास्त्र

पिसुर्लेतील सभेमध्ये गावोगावी जनजागृती करण्याचा निर्णय

दैनिक गोमन्तक

होंडा : रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे पिसुर्ले येथे म्हादईप्रश्‍नी सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये उपस्थित वक्त्यांनी गोवा सरकारने म्हादई कर्नाटकला विकली असल्याची टीका केली. तसेच पक्षातर्फे ‘टूगेदर फॉर म्हादई’च्या बॅनरखाली रविवार, 15 जानेवारीपासून राज्यभर व्यापक चळवळ सुरू केली असल्याचे सांगण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून पिसुर्लेत सभा घेण्यात आली. या विषयावर जनजागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणतज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. (Mahadayi Water Dispute)

काँग्रेसतर्फे कलश यात्रा

म्हादईप्रश्‍नी काँग्रेस पक्षाने वाळपई मतदारसंघातील नानोडा येथे म्हादई नदीचे पूजन करून कलश यात्रेला शुभारंभ केला. ही म्हादई कलश यात्रा संपूर्ण राज्यभर फिरणार आहे. यावेळी नानोडा येथे काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, वाळपई काँग्रेस गटाध्यक्ष कृष्णा नेने, पदाधिकारी वरद म्हार्दोळकर, अमरनाथ पणजीकर, माजी आमदार प्रताप गावस उपस्थिती होते.

म्हादई नदी पात्रात रेखाटली चित्रे : गुळेली येथे म्हादई नदीच्या पात्रात रविवारी विविध चित्रकार एकवटले आणि त्यांनी म्हादईच्या बचावासाठी चक्क नदी पात्रात चित्रे रेखाटली. यात आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. वॉटर कलर चित्रकार संघटनेने आयोजित केलेल्या या उपक्रमात प्रसिद्ध चित्रकारांनीही भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT