Tilari Canal  Dainik Gomantak
गोवा

Tillari Canal: ‘तिळारी’चे भगदाड बुजवणे आजपासून सुरू; गोव्याकडे पुरेसा पाणीसाठा

Tillari Dam: कालव्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी गोवा सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: तिळारी कालव्याला पडलेले भगदाड मोठे नाही. ते बुजवण्याचे काम उद्या, सोमवारी हाती घेतले जाणार आहे. पावसाळा असल्याने पाण्याची मागणी मोठी नाही, तरीही गोव्याकडे पुरेसा पाणीसाठा आहे. आमठणेतून अस्नोडा प्रकल्पात पाणी सोडले जात आहे, अशी माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ‘गोमन्तक''ला दिली.

तिळारी कालव्याला धनगरवाडी-कुडासे (दोडामार्ग-महाराष्ट्र) येथे भगदाड पडल्याची घटना शनिवारी घडली. त्यामुळे कालव्यातून होणारा पाणी पुरवठा तत्काळ बंद करावा लागला, त्यामुळे गोव्यात येणारे पाणी बंद झाले होते. कालव्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी गोवा सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. कालवा फुटल्याने गोव्यात येणारे पाणी बंद झाले असल्याने त्याचा परिणाम येथील काही तालुक्यावर होईल, असे वाटत होते.

पावसाळा असल्याने पाणी बंदचा फारसा परिणाम होणार नाही, असे मंत्र्यांचे म्हणणे आहे. आमठणे धरणातून अस्नोडा प्रकल्पात पाणी सोडण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उद्‍भवणार नाही. परंतु तरीही उद्या, सोमवारी दुपारी सर्व अभियंत्यांना घेऊन तिळारी कालवा फुटीविषयी आढावा घेऊन पावले उचलली जातील, असे शिरोडकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT