CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Government Job: 'सरकारी नोकऱ्यांची भरती नोकर भरती आयोगाद्वारे केली जाणार' मुख्यमंत्र्यांच्या हेतूबद्दल शंका!

मुख्यमंत्र्यांच्या हेतूबद्दल शंका; आधी नियमावली बदला; मग अनुभवाची अट घाला

दैनिक गोमन्तक

मडगाव: यापुढे सरकारी नोकऱ्यांची भरती नोकर भरती आयोगाद्वारे केली जाणार, या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत केले गेले असले तरी सरकारी नोकरीसाठी खासगी आस्थापनात काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव गरजेचा, या घोषणेकडे काहीसे शंकेनेच पाहिले जात आहे.

(CM Pramod Sawant)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घोषणेबाबत सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ यांना विचारले असता ते म्हणाले, सध्याची जी नोकर भरती नियमावली आहे ती आधी बदलावी लागेल. सध्याची जी नोकर भरती पद्धती आहे त्यात कार्यालयीन प्रशिक्षणाची तरतूद यापूर्वीच आहे. त्याशिवाय त्यांना दोन वर्षे प्रोबेशन काळ असतो.

कुठलाही कर्मचारी कामास पात्र नसल्यास त्याला या दोन वर्षांत कामावरून काढता येते. अशा सर्व गोष्टी सरकारी नोकर भरती कायद्यात समाविष्ट असताना नवीन अनुभवाची अट घालण्याची गरज काय? सरकारी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रभाकर तिंबले म्हणाले, सरकारकडे वेगवेगळ्या खात्यांत कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कित्येक अनुभवी कर्मचारी आहेत. सरकारला प्रशासन चालविण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज आहे तर ते या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत का घेत नाहीत. युवकांना कमी पगारात खासगी कंपन्यांच्या दावणीला बांधण्याचा हा डाव असल्याचा संशय आल्याशिवाय राहात नाही, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BCCI Central Contract: बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक! रोहित-विराटचं 'डिमोशन' तर शुभमन गिलचं टॉपचं प्रमोशन; सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर

India vs Pakistan: क्रीडाविश्वात हाय-व्होल्टेज ड्रामा! भारत-पाक महामुकाबल्यावर बहिष्काराचं सावट; आयसीसीनं धुडकावल्या मोहसीन नक्वीच्या मागण्या

Nerul: सफर गोव्याची! 400 वर्षांपूर्वी दैवत हलवून मांद्रे येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले; भक्तीरसातले 'नेरुळ'

Esakal: विश्वासार्हतेचा विजय! मराठी मनाचा मानबिंदू आता डिजिटलचाही 'राजा'; 5.6 कोटी युजर्ससह ई-सकाळ नंबर-1

Surya Grahan 2026: यंदाची महाशिवरात्री ठरणार 'टर्निंग पॉईंट'! सूर्यग्रहण कोणासाठी शुभ-अशुभ? 'या' 4 राशींच्या अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT