Banastarim Bridge Accident, Mardol police station Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघातप्रकरणी पोलिसांची कृती शंकास्पद; स्वप्निल भोमकर

अपघाताची दृश्‍ये आठवली की अंगावर काटा येतो!

दैनिक गोमन्तक

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी पूलावर अपघात घडला त्यावेळी मी तेथे 5 ते 10 मिनिटात पोहोचलो. अपघाताचे दृश्‍य आठवलेकी अंगावर काटा उभा राहतो. तो अपघात एवढा भयावह होता की, मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या अपघातातील मृतांच्या फडते कुटुंबीयांना पोलिस न्याय मिळवून देतील, असा दावा करत आहेत.

परंतु वास्तविक पोलिसांची कारवाई पाहता अपघातास कारणीभूत चालकाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे दिसून येते. त्यामुळे पोलिसांच्या कृतीबाबत शंका व्यक्त होत असल्याचे मत दिवाडीचे उपसरपंच स्वप्निल भोमकर यांनी व्यक्त केले.

ते ‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात ॲड. रविराज चोडणकर तसेच ‘गोवा रोड सेफ्टी फोरम’चे अध्यक्ष दिलीप नाईक बोलत होते. दरम्यान भोमकर म्हणाले, पोलिसांनी जी जबानी नोंदविली आहे, त्यात वेगळेपणा दिसून येत आहे.

ज्यावेळी मेघना सावर्डेकर पोलिसांना चालकाच्या आसनावर दिसली. त्यावेळी तिची देखील तपासणी करणे गरजेचे होते. अपघात कोणीही केला तरी, वाहनाच्या मालकाला पोलिस स्थानकात बोलावले जाते. परंतु तिला अद्याप बोलावले जात नाही, या सगळ्या घटनांमुळे पोलिसांवरील सांशकता अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

हाताचे ठसे का घेतले नाहीत ?

पोलिसांची चौकशी ही अपघातग्रस्तांना न्याय देण्याच्या अनुषंगाने नसून अपघातास कारणीभूत व्यक्तीला वाचविण्याच्या दृष्टीने होत असल्याचे दिसून येत आहे. अपघातानंतर वाहन कोण चालवत होते, हे कळण्यासाठी हातांचे ठसे घेणे गरजेचे होते. प्रत्यक्षदर्शी दिग्विजय वेलींगकर यांची जबानी ग्राह्य धरली जात नाही.

एका मंत्र्यांच्या सांगण्यावरून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय असून म्हार्दोळ पोलिसांनी आपली विश्‍वासार्हता गमावल्याने या अपघाताची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी ॲड. रविराज चोडणकर यांनी केली.

दुदैवाने तसे घडत नाही !

अपघात घडतो, त्यावेळी वाहनातील व्यक्ती शक्य तेवढ्या लवकर वाहनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते. अपघातानंतर सीट बदलत नाहीत. बाणस्तारी पुलावर जो अपघात झाला, त्यातील गाडीचा वेग 100-120 किमी प्रति तास एवढा असण्याची शक्यता आहे. ज्यावेळी अपघात होतो, त्यावेळी पोलिसांनी दुखापतग्रस्त तसेच मृत व्यक्तींना आधी पाहिले पाहिजे,त्यांना ताब्यात घेतले पाहिजे. आल्कोमीटरचा वापर केला पाहिजेच,परंतु दुदैवाने तसे घडताना दिसत नाही,अशी खंत दिलीप नाईक यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT