108 ambulance 
गोवा

पर्वरी परिसरातील लोकांना रुग्णवाहिकेची नितांत गरज

Datta Shirodkar

पर्वरी,  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सरकारतर्फे १०८ रुग्णवाहिका देण्यात आली होती. त्या रुग्णवाहिकेचा पर्वरी परिसरातील लोकांना खूप फायदा होत होता. पर्वरी परिसरात कुठेही छोटे-मोठे अपघात झाले असता ती तत्परतेने घटनास्थळी पोहचून लोकांचे प्राण वाचवत असे. पण, आता ही रुग्णवाहिका सरकारने अचानक काही कारणास्तव तिला बांबोळी येथील वैद्यकीय इस्पितळात हलविल्याने येथील लोकांची बरीच गैरसोय होत आहेत. सरकारने ती परत पर्वरी आरोग्य केंद्रात द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
आमदार रोहन खंवटे सरकारचे घटक होते. त्यावेळी त्यांच्या प्रयत्नाने येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रयत्नाने एका रुग्णवाहिकेचीही सोय करण्यात आली होती. पण, आज आमदार खंवटे सरकारच्या ध्येय धोरणावर गंभीर टीका करतात. सरकारच्या विरोधात उघडपणे बोलतात. त्याचा परिणाम म्हणून ही रुग्णवाहिका काढून घेतली का असा संशय ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहे.
काहीही असो, पर्वरी परिसर झपाट्याने शहरीकरणाकडे झुकत आहे. त्यात ‘कोविड-१९’ या महामारीने पर्वरी उच्छाद मांडला आहे. दिवसेंदिवस या महामारीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा मोक्याच्या वेळी या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेची सोय असणे नितांत गरजेचे आहे. सरकारचे रुग्णवाहिका हलविण्यामागे राजकारण असेल तर तूर्त या घडीला ते मागे ठेवावे व पर्वरी आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका परत द्यायला हवी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT