Panaji police station attack

 

Dainik Gpmantak 

गोवा

Panaji police station attack: गोवा खंडपीठाने फेटाळल्या सर्व याचिका

या प्रकरणातील सुनावणी सुरू करण्याचे निर्देश खंडपीठाने संबंधित न्यायालयाला दिले आहेत

दैनिक गोमन्तक

Panjim: पणजी पोलीस स्थानक हल्लाप्रकरणी (Panaji police station attack) मंत्री जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserrate) तसेच अन्य संशयितनी आरोप निश्चितीच्या आव्हान दिलेल्या सर्व याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने (Goa Bench of the Mumbai High Court) फेटाळल्या आहेत.

खंडपीठाच्या या आदेशाला याचिकादारांनी स्थगिती देण्याची विनंती अर्जाद्वारे केली तो अर्जही खंडपीठाने फेटाळला. या प्रकरणातील सुनावणी सुरू करण्याचे निर्देश खंडपीठाने संबंधित न्यायालयाला (Court) दिले आहेत

काय आहे पार्श्वभूमी?

19 फेब्रुवारी 2008 रोजी बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांनी कार्यकर्त्यांसह पणजी पोलीस स्थानकावर मोर्चा नेला होता. एका तरुणाला मारहाणप्रकरणी संशयितांना अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांकडून (Goa Police) त्याची दखल न घेतल्याने पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली. मात्र, हिंसक कार्यकर्त्यांच्या जमावाने पोलिस स्थानकाबाहेर संरक्षक भिंत तयार करून उभ्या असलेल्या पोलिसांवर प्लास्टिक बाटल्या तसेच दगडफेक करून हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलीस जखमी झाले होते. पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यावर सर्व नेते व कार्यकर्ते तेथून पसार झाला होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

SCROLL FOR NEXT