Padocem Dainik Gomantak
गोवा

Padocem Water Plant: ‘पडोसे’ जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड; साखळी, डिचोलीवासीय त्रस्त

Padocem: जलशुद्धीकरण प्रकल्पात वीज बिघाड निर्माण झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: नळाद्वारे पाणी पुरवठा बंद राहिल्याने आज पवित्र असा पहिला ''श्रावणी सोमवार'' कोरडा गेला. त्यामुळे गृहिणींसह भक्तांची मोठी गैरसोय झाली. साखळीसह डिचोलीतील काही भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पात वीज बिघाड निर्माण झाल्याने काल (रविवारी) रात्रीपासून पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. अशी माहिती जलस्रोत खात्याच्या सूत्रांकडून मिळाली.

परिणामी साखळीसह कारापूर, सर्वण आणि डिचोलीतील काही भागात काल रात्रीपासून आज (सोमवारी) दिवसभर नळ कोरडे राहिले. त्यामुळे पाण्यासाठी जनतेचे हाल झाले. हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला.काल रात्रीपासून नळाद्वारे पाणी न आल्याने महिलांची गैरसोय झाली.

व्रत पाळणाऱ्या भक्तांची गैरसोय

नळ कोरडे राहिल्याने सोमवार व्रत पाळणाऱ्या भक्तांची मोठी गैरसोय झाली. नळाद्वारे पाणी पुरवठा बंद राहिल्याने महिलांसह पुरुषांना पाण्यासाठी जवळपासच्या विहिरीवर धाव घ्यावी लागली. बहूतेक महिला तर नळांना पाणी कधी येईल. त्याची प्रतीक्षा लागून राहिली होती. जलशुद्धीकरण प्रकल्पातील बिघाड दूर करुन, सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नळांना पाणी आले, आणि मग जनतेचा जीव भांड्यात पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय! मडगाव रवींद्र भवनचा होणार कायापालट; व्हॅट कायद्यात सुधारणा अन् 'जीआयएम'ला विद्यापीठाचा दर्जा

कोलवाळमध्ये टॅक्सी चालकांची गर्दी! मोपा विमानतळावरील 'वसुली' विरोधात आंदोलन; 210 रुपये शुल्कामुळे संतापाची लाट

Dhirio in Colva: सुरावलीत पुन्हा धीरियोचा थरार, पोलिसांकडून FIR दाखल; Viral Video वरुन चर्चा..

Savoi Verem: झुळझुळ वाहणारे शीतल झरे, बागायतींनी नटलेला परिसर; मांडवीच्या कडेवर वसलेला गाव 'सावईवेरे'

Goa History: ‘पोर्तुगिजांनो चालते व्हा'! डॉ. गायतोंड्यांना अटक केली, 17 फेब्रुवारी 1955ला अनेक सत्याग्रही म्हापशाला जमा झाले..

SCROLL FOR NEXT