Vathadev Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दारुच्या नशेत कंरजाळे किनाऱ्यावर एकाचा खून; पैशांच्या व्यवहाराचा होता वाद

संशयिताने दिली गुन्ह्याची कबुली दिली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कंरजाळे समुद्रकिनाऱ्यावर दारूच्या नशेत असताना पैशांच्या व्यवहारावरून खुन झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयिताला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली ही दिली आहे.

(One has been murdered on the Caranzalem-Miramar beach)

मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री संशयित मोहनराव केलकर (29) व समीर उर्फ छोटू (36) यांच्यात वाद झाला होता. या वादादरम्यान डोक्यावर लाकडी दंडुक्याने प्रहार केल्याने समीरचा खून झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री मृत समीर उर्फ छोटू व मोहनराव केसरकर हे कंरजाळे येथे समुद्रकिनाऱ्यावर आले होते. यावेळी समीर याने मोहनराव यांच्याकडून उसने पैसे घेतलेले मागण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांनीही मद्यप्राशन केले होते.

काही वेळातच त्यांचा जोराचा वाद सुरु झाला. व मोहनराव याने समीरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पैसे देत नाही असे समीरने सांगितल्यावर चिडलेल्या मोहनराव याने समुद्रकिनाऱ्यावरील लाकडी दंडुक्याने समीरच्या डोक्यावर प्रहार केला. यात समीरचा खून झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT